[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>छत्तीसगढमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्यामुळे संपूर्ण कालवा रिकामं करण्यात आला असून त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेल्याचं चित्र छत्तीसगढमध्ये पाहायला मिळालं आहे. अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी राजेश विश्वास हे छत्तीसगढच्या कांकेर जिल्ह्यामध्ये गेले असताना त्यांचा फोन एका कालव्यात पडला. त्यानंतर त्यांचा मोबाईल शोधण्यासाठी संपूर्ण कालवा रिकामा केला. त्यामुळे जवळपास 41 लाख लीटर पाणी वाया गेल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी राजेश विश्वास या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय.</p>
[ad_2]
Chhattisgarh : मोबाईलसाठी कालव्यातून लाखो लीटर पाणी उपसलं
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/05/574a6ebdbff27f9f18de82c7b9b1906b168516064948790_original.jpg)