Team India Captain Rohit Sharma Level With Former Captain Saurabh Ganguly By Winning Eight Matches In A Row In World Cup Edition

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma : टीम इंडियाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने आपले सर्व सामने एकतर्फी जिंकले आहेत. प्रतिस्पर्धी संघ भारतासमोर पूर्णपणे शरणागती पत्करताना दिसला. साखळी टप्प्यात भारत अव्वल आहे आणि आता भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर येईल. मात्र, भूतकाळ पाहता ही भारतासाठी चांगली बातमी नाही. ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थानावर राहणे भारतासाठी अशुभ ठरले आहे.

रोहितची गांगुलीशी बरोबरी 

टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये सलग सामने जिंकत विरोधी संघाना नामोहरम केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं सलग आठ सामने जिंकत थेट आता माजी कॅप्टन सौरभ गांगुलीशी बरोबरी केली आहे. 2003 वर्ल्डकपमध्येही टीम इंडियाने दमदार कामगिरी करताना सलग आठ सामने जिंकले होते. मात्र, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. रोहितच्या नेतृत्वात सुद्धा या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने 11 सामने जिंकले आहेत. वर्ल्डकपमध्ये सलग 11 सामने जिंकण्याचा पराक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. 

2023 च्या विश्वचषकात भारताविरुद्ध आतापर्यंत कोणताही संघ उभा राहू शकलेला नाही. जिंकणे विसरा, कोणत्याही संघाने भारताला तगडी स्पर्धाही दिली नाही. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी भारतासमोर शरणागती पत्करली आहे. आता टीम इंडियाचा शेवटचा साखळी सामना नेदरलँड्सविरुद्ध आहे. भारताचे सध्या आठ सामन्यांत 16 गुण आहेत आणि निव्वळ धावगतीही सर्व संघांपेक्षा चांगली आहे. अशा स्थितीत बाद फेरीपूर्वी भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील.

2015 मध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर होती, मात्र विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

2015 मध्ये, गतविजेता म्हणून आलेली टीम इंडिया लीग टप्प्यात अव्वल स्थानावर होती. भारताने साखळी फेरीत ब गटात पहिले स्थान पटकावले होते. भारताने साखळी फेरीतील सर्व 6 सामने जिंकले होते. यानंतर टीम इंडियाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 95 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत न्यूझीलंडनेही आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते, पण तेही विजेतेपदापासून वंचित राहिले.

2019 मध्ये लीग टप्प्यातही पहिले स्थान मिळवले, उपांत्य फेरीत पराभव 

2015 नंतर, 2019 च्या विश्वचषकातही भारत साखळी टप्प्यात अव्वल स्थानावर राहिला. 2019 चा विश्वचषक फक्त राऊंड रॉबिन स्वरूपात खेळला गेला आणि टीम इंडियाला स्पर्धेत फक्त एकच सामना गमवावा लागला. 9 सामन्यांत 8 विजय मिळवून भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. मात्र, यानंतर टीम इंडियाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

2023 मध्येही भारत अव्वल, यावेळीही स्वप्न पूर्ण होणार नाही का?

2023 च्या विश्वचषकातही टीम इंडिया लीग स्टेजमध्ये पहिल्या स्थानावर राहील. अशा स्थितीत मागील आकडेवारी पाहता भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न यावेळी पूर्ण करून हा इतिहास मोडित काढेल, अशी आशा करायला हरकत नाही. कारण न्यूझीलंड आणि इंग्लंडलाही टीम इंडियाने 20 वर्षांनी वर्ल्डकपमध्ये नमवण्याची कामगिरी याच वर्ल्डकपमध्ये केली. त्यामुळे भूतकाळात जे घडले ते भविष्यातही घडेलच असे नाही. तरीही साखळी फेरीत अव्वल स्थानावर राहणे भारतासाठी अशुभ राहिलं आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts