[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना भारतीय निवडणूक आयोगानं निलंबित केलंय. याचं कारण म्हणजे अंजनी कुमार यांनी अति उत्साह दाखवत रवंथ रेड्डी यांची भेट घेत अभिनंदन केलं. हा आचारसंहितेचा उघड भंग होता. कारण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, अजूनही बरेच सोपस्कार बाकी आहेत. अशातच, राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस महासंचालकानं एका उमेदवाराची भेट घेणं नियमात बसत नाही. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांना तात्काळ निलंबित केलं. </p>
[ad_2]