[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
३ जलद गोलंदाज आणि इतके फिरकीपटू…
माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या मते भारताने फायनल मॅचसाठी ३ जलद गोलंदाज आणि २ फिरकीपटूंना संधी द्यावी. विकेटकीपर म्हणून ईशान किशनच्या ऐवजी केएस भरतची निवड करावी. भारताचा २०२१ साली न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर आता संघाला चॅम्पियन होण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. अंतिम सामन्यासाठी गावस्करांनी विकेटकीपर म्हणून केएस भरतची निवड केली आहे.
फलंदाजीबाबत बोलताना ते म्हणाले, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सलामीला यावे. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्यावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेने फलंदाजी करावी.
गावस्करांच्या मते भारतीय संघ सहाव्या क्रमांकाबाबत थोडा कमकूवत दिसतो. या क्रमांकासाठी भरत आणि ईशान किशन हे दोन पर्याय आहेत. मला वाटते सहाव्या क्रमांकावर भरतने फलंदाजी करावी. त्याने आतापर्यंत सर्व मॅच खेळल्या आहेत. गोलंदाजीबाबत संघात ३ जलद आणि २ फिरकीपटू असावेत असे ते म्हणाले. अंतिम सामन्यासाठी त्यांनी अक्षर पटेलचा संघात समावेश केला नाही.
कोण असतील ३ जलद गोलंदाज
सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा, आठव्या क्रमांकावर आर अश्विन हे चांगली फलंदाजी करू शकता. जलद गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मस सिराज आणि शार्दुल ठाकूर हे असतील. गावस्करांच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने वनडेत द्विशतक करणाऱ्या ईशान किशनला स्थान दिले पाहिजे असे म्हटले होते. पॉन्टिंगच्या मते ईशान हा संघासाठी X फॅक्टर ठरू शकतो.
गावस्करांचा WTC फायनलसाठीचा संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर.
[ad_2]