[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पण, या सामन्यात ऑस्ट्रेलिया वरचढ ठरली. अशा परिस्थितीत टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची १० वर्षांची प्रतीक्षा लांबली आहे. या पराभवानंतर भारतीय खेळाडू खूपच निराश झालेले दिसले.
कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला ICC ट्रॉफी म्हणून गदा दिली जाते. पुरस्कार सोहळ्यादरम्यान विराट कोहली स्टेजवरून गेला तेव्हा त्याने तिथे ठेवलेल्या गदाकडे ढुंकूनही पाहिले नाही. विराट कोहलीसह भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. आयसीसी ट्रॉफीमध्ये संघ सतत लॉक आऊट फेरित गेल्यानंतर पराभूत होत आहे. भारताने २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये अखेरची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.
रोहित शर्मा जेव्हा जेव्हा पत्रकार परिषदेला येतो तेव्हा त्याचा विनोदी अंदाज पाहायला मिळते. तो काहीतरी असं बोलून जातो ज्यामुळे सगळे हसायला लागतात. मात्र, अंतिम फेरीतील पराभवानंतर तसं झालं नाही. रोहितच्या चेहऱ्यावरून हसू गायब होते आणि त्याच्या चेहऱ्यावर दु:ख आणि निराशेचे भाव स्पष्ट दिसत होते.
विराट कोहलीच्या विकेटने भारतीय संघाचा पराभव निश्चित झाला होता. मात्र, अजिंक्य रहाणेने टिकून राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिचेल स्टार्कच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. आऊट झाल्यानंतर रहाणेने डोक्यावरच हात मारला. कारण, तो बाद झाल्याने टीम इंडियाची शेवटची आशाही संपली होते.
नॅथन लायनने भारताची शेवटची विकेट घेतली. त्याने मोहम्मद सिराजला बाद केले. आऊट झाल्यानंतर सिराज आणि नॉन स्ट्राइक एंडला उभा असलेला शमी एकमेकांकडे बघू लागले, तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ आनंद साजरा करत होता आणि भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर नाराजी उमटलेली होती. हे पाहून चाहत्यांनाही नक्कीच वाईट वाटलं असेल.
[ad_2]