लाल किल्ल्यावरुन मोदींकडून मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख! म्हणाले, ‘आया-बहिणींच्या सन्मानाशी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Independence Day Speech: स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये मणिपूरमधील हिंसाचाराचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन तेथील नागरिकांना केलं. तसेच संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे असा विश्वास मोदींनी मणिपूरमधील नागरिकांना दिला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. जुलै महिन्यामध्ये येथील महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरामध्ये या हिंसाचारासंदर्भात संताप व्यक्त करण्यात आला. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्येही मणिपूरचा मुद्दा चांगलाच गाजला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मोदींना आणि केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारला…

Read More