[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
कुठं घडला अपघात?
आंध्र प्रदेशातील वायएसआर जिल्ह्यातील कोंडापुरम मंडळात इटुरु गावाजवळ हा अपघात झाला. इटुरु गावाजवळ भरधाव ट्रकनं एसयूव्ही कारला धडक दिली ही घटना सकाळी घडली.
स्थानिक अधिकारी सुदर्शन प्रसाद यांनी १४ जण एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते. अनंतपूर जिल्ह्यातील तडीपात्री आणि कर्नाटकातील बेल्लारीमधील नातेवाईक तिरुपती बालाजीला दर्शनाला गेले होते. तिरुपती बालाजीच्या दर्शनावरुन परत येताना भभरधाव कारनं धडक दिली.
देवदर्शन करुन ते १४ जण एसयूव्हीतून कडप्पा ते तडीपात्री महामार्गावर पोहोचले तेव्हा समोरुन येणाऱ्या भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं धडक दिली. या धडकेत क्षणाचं होत्याच नव्हतं झालं. ट्रकची धडक इतकी मोठी होती की एसयूव्ही कारचा क्षणात चक्काचूर झाला. देवदर्शनावरुन येताना आनंदी असलेल्यांपुढं मोठं संकट कोसळलं आणि ७ जण जागीच ठार झाले. अपघातानंतर मृतदेह रस्त्यावर पडले होते. जखमी झालेल्यांना काही समजत देखील नव्हतं, इतका मोठा आघात त्यांच्यावर झालेला होता.
कारमधील भाविक दोन राज्यातील
आंध्र प्रदेशच्या वायएसआर जिल्ह्यात झालेल्या ट्रक आणि कारच्या अपघातात ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या कारमधून प्रवास करणारे भाविक आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील होते. काही जण आंध्र प्रदेशच्या अनंतपूर तर काही जण कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यातील होते.
दरम्यान, कोंडापुरम पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच अपघात स्थळी धाव घेतली. सात जखमींना तडीपात्रीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य सुरु केल्यानंतर वाहतूक सुरळीत केली.
[ad_2]