[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Indians : मुंबईची तमिळनाडूवर एक डाव 70 धावांनी मात , मुंबईत रणजी करंडकाची फायनल
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मुंबई ४२व्यांदा प्रतिष्ठेच्या रणजी करंडकावर आपलं नाव कोरणार का? आम्ही हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मुंबईनं तामिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी धुव्वा उडवून, रणजी करंडकाच्या फायनलमध्ये मारलेली धडक. रणजी करंडकाच्या या फायनलमध्ये मुंबईचा मुकाबला मध्य प्रदेश आणि विदर्भ यांच्यामधल्या विजयी संघाशी होईल. हा सामना येत्या रविवारपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
[ad_2]