El Nino Effect In India 2023 Tension To Government As Rice Vegitables And Food Product Price Will Hike; चक्रीवादळ, महामारी आणि भूकंपानंतर भारतावर एल निनोचं संकट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : देशात एकीकडे चक्रीवादळ, मान्सून आणि भूकंपाने थैमान घातलं आहे. अशात बिपरजॉय चक्रीवादळाने देशातल्या ९ राज्यांना मोठा फटका बसला आहे. पण या सगळ्यामध्ये भारतावर आणखी एक मोठं संकट आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसणार आहे. खरंतर, गेल्या ३ दिवसांत आलेल्या महागाईच्या आकड्यांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. किरकोळ महागाईविषयी बोलायचं झालं तर ती २ वर्षांच्या नीच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. अशात, घाऊक महागाई ३ वर्षांच्या खालच्या पातळीवर आहे. हे आकडे सगळ्यांसाठी दिलासादायक होते पण आता मात्र असं चित्र राहणार नाही.देशात पुन्हा एकदा महागाई वाढवू शकते आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे एल निनो. यामुळे साखरेपासून डाळी, तांदूळ, भाज्यांचे भाव गगनाला भिडू शकतात. इतकंच नाहीतर, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. एल निनोमुळे सर्वसामान्यांसोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेचंही मोठं नुकसान होईल. याचा नेमका कसा प्रभाव होईल? सविस्तर जाणून घेऊयात…

Maharashtra Weather: राज्यभर पाऊस पण हे ४ जिल्हे तापून निघणार, हवामान खात्याकडून कडक उष्णेतचा इशारा

एल निनोमुळे महागाईचा धोका वाढला…

देशाला अनेक दिवसांपासून एल निनोचा इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांनीही यासंबंधी धोक्याचा इशारा दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पादन कमी होऊन याचा मान्सूनवरही परिणाम पाहायला मिळेल. यामुळे देशाला पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागू शकतो. जर दुष्काळ पडला तर खाद्यपदार्थांच्या किमती वाढतील आणि यामुळे देशातील किरकोळ महागाईदेखील वाढताना दिसेल.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, याचा थेट परिणाम डाळी, तांदूळ, साखर, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंवर पाहायला मिळेल. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या तर महागाईही वाढेल आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येईल, अशी स्पष्ट भीती वर्तवण्यात आली आहे.

मुंबईकरांसाठी Good News! २०२४ पर्यंत मिळणार नवं विमानतळ, सगळं असेल हायटेक; वाचा खास वैशिष्ट्ये

सरकारही सतर्क…

सध्याची किरकोळ महागाई २५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे आणि घाऊक महागाई देखील शून्यावरून ३ टक्क्यांहून खाली आली आहे. ही सध्यासाठी चांगली बातमी असली तर येणाऱ्या काळात वाढणारी महागाई नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे. तज्ञांच्या मते, कृषी आणि अन्न मंत्रालयाने आधीच यासंबंधी घोषणा केली असून एल निनोचा परिणाम अन्न उत्पादनांच्या उत्पादनावर दिसून येईल, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

महागाईला आळा घालणं सोपं नाही…

आयसीएफएचे अध्यक्ष डॉ. एम जे खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एल निनोमुळे पृथ्वी तापत जाईल आणि अशात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाची शक्यता नाकारता येत नाही. जर असं झालं तर खरीप पिकांच्या उत्पादनातही घट होऊ शकते. यामुळे तांदळाबरोबरच साखर आणि डाळींच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. अशात महागाई तर जाणवेल पण वाढत्या गर्दीमुळे धान्य पुरवठ्याचीही कमतारता जाणवू शकते. यामुळे खाद्यपदार्थांची मागणी आणि पुरवठा यातील तफावत कमी करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. पण तसे करणे थोडे कठीण असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

Mumbai Murder Case : सरस्वतीचा DNA, मनोजचा ‘तो’ मेसेज अन् सेक्स अ‍ॅडिक्ट; मिरारोड मर्डर केस पोलिसांनी सोडवली?

साखर आणि तांदळू आणखी महागणार…

देशातील साखर आणि तांदूळ उत्पादनाची स्थिती अशीही चांगली नाही. अशात ISMA ने साखर उत्पादनाबाबत आधीच इशारा दिला आहे. ISMA च्या मते, साखरेचं उत्पादन ३.४० दशलक्ष टनांवरून ३.२८ दशलक्ष टनांपर्यंत कमी केलं जाऊ शकतं. दुसरीकडे थायलंड, चीन, पाकिस्तान या देशांमध्येही साखर उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आयातही महाग होणार आहे. अशा परिस्थितीत मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्यास साखरेच्या दरात वाढ होऊ शकते.

आता तांदूळ उत्पादनासंबंधी बोलायचं झालं तर एल निनोच्या प्रभावामुळे पेरणी कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ तसेच घाऊक दरात वाढ होऊ शकते. सध्या किरकोळ बाजारात तांदळाचा भाव ४० रुपये किलो आहे. सरकारने तूर आणि उडीद डाळींच्या साठ्यावर मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे जर एल निनोचा प्रभाव तीव्र जाणवला तर कदाचित डाळी उत्पादनावरही याचा मोठा परिणाम पहायला मिळेल.

Monsoon Update: यंदा मान्सूनची जोरदार बॅटिंग, धो-धो बरसणार, पण जूनमध्ये…; IMD चा हवामान अंदाज

[ad_2]

Related posts