[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : महाराष्ट्रात कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) तर कुठे उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता अद्यापही कायम आहे.
पुढील 24 तासातही मुसळधार पावसाचा अंदाज
विदर्भ, मराठवाड्याला गेल्या चार-पाच दिवसात पावसानं झोडपून काढलं आहे. पुढील 24 तासातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणातील काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात सरासरी तापमानात 4.5 अंश सेल्सिअसहून अधिक वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज कमाल तापमान 37-39 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
[ad_2]