सांगली (pragatbharat.com): लोकसभा निवडणुकीतील चित्र पाहता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी वारंवार यावे. जेणेकरून, राज्यात लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होऊन महाविकास आघाडीचा विजय सुकर होईल, असा टोला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भाजपला लगावला. सध्या राज्यात सत्ता बदलासाठी अनुकूल वातावरण असल्याचेही पवार यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट सांगितले. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी राज्यात १८ प्रचार सभा घेतल्या. त्यापैकी, १४ ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. आता त्यांनी विधानसभेलाही राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात म्हणजे महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल, असे पवार यावेळी म्हणाले.
Related posts
-
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली (pragatbharat.com):- मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून... -
मोशी येथील २५० मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
मोशी येथील २५० मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू पुणे, दि. २४ : मोशी... -
हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणजे यावली ची चाँदपीर यात्रा….
30/5/2024 गुरुवार संदल 31/5/2024 धमाका म्युझिकल कोल्हापूर व गावात देव मिरवणूक व शोभेची दारू सोलापूर:बार्शी तालुक्यातील...