Arvind Kejriwal threat to unity claims Congress after meeting of opposition leaders in Patna; केजरीवालांचा विरोधकांच्या ऐक्यात खोडा, काँग्रेसचा आरोप, पाच पक्षांचे नेते नाराज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी रविवारी ‘आप’वर टीकास्त्र सोडले. ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधी ऐक्याबाबतच्या घोषणा एकजुटीसाठी नाहीत. हा ऐक्य मोडीत काढण्यासाठीचा भारतीय जनता पक्षाबरोबर मिळून केलेला कट आहे,’ असा आरोप माकन यांनी केला.

‘केंद्राने काढलेल्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी केजरीवाल काँग्रेसची मदत मागतात. मात्र, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यासह राजस्थानातील नेत्यांची ते थट्टा करतात,’ असेही माकन म्हणाले. ‘युती करण्यासाठी ‘आप’ पूर्वअट ठेवते, तर त्यांचे प्रवक्ते विरोधी पक्षांच्या बैठकीच्या दिवशी काँग्रेसचा आणि नेत्यांचा जाहीर अपमान करतात. आधी टीका करायची आणि नंतर पाठिंबा मागायचा, ही कुठली पद्धत आहे,’ असा सवालही माकन यांनी ट्विटरद्वारे केला.

माकन म्हणाले, ‘केजरीवाल यांचे अलीकडील राजकीय डावपेच गोंधळात टाकणारे आहेत. भाजपला मदत करण्यासाठी आणि काँग्रेसचे नुकसान करण्यासाठी ‘आप’ भ्रष्टाचाराचा पैसा अनेक राज्यांतील निवडणुका लढवण्यासाठी वापरते.’

सहा मुस्लीम देशांवर बॉम्ब टाकले होते, आता आम्हाला… अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर सीतारामन यांचा हल्लाबोल

‘विरोधी ऐक्याला धक्का नाही’

‘आम आदमी पक्षाने पाटणा येथे झालेल्या सभेदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या ऐक्यावर फरक पडणार नाही,’ असे स्पष्टीकरण भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी दिले. ‘सर्व राजकीय पक्ष स्वतंत्र असल्याने त्यांच्यात काही लहान मतभेद असू शकतात. मात्र, ते चर्चेद्वारे नक्कीच दूर केले जाऊ शकतात,’ असेही त्यांनी सांगितले. ‘विरोधी पक्षांचे नेतृत्व कोण करणार हा आत्ताचा मुद्दाच नाही. मात्र, भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची भीती वाटत असल्याने भाजप असे मुद्दे उपस्थित करीत आहे. एकत्र आलेले धर्मनिरपेक्ष लोकशाही पक्ष कोणत्याही मुद्द्यावर एकत्रितपणे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. देश आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी भाजपला सत्तेवरून हटविणे हेच प्रमुख लक्ष्य असल्याचे सर्व पक्षांनी यापूर्वी सांगितले आहे,’ असे राजा म्हणाले.

देशाची एकता कायम राखण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी सर्वजण एकत्र आलेत | उद्धव ठाकरे

आपवर मंत्री नाराज

केंद्रीय अध्यादेशाच्या मुद्द्यावर कथित उदासीनतेबद्दल आम आदमी पक्षाने काँग्रेसवर आरोप केला. त्यामुळे पाटणा येथे नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीतील किमान पाच पक्षांचे नेते ‘आप’वर नाराज असल्याचे समजते. ‘केंद्राच्या अध्यादेशाचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षांचे एकमत होते. मात्र, ‘आप’ने हा मुद्दा व्यापक संदर्भात मांडला पाहिजे. काँग्रेसने बैठकीत अध्यादेशाला विरोध करण्यास नकार दिला, असे ‘आप’ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे,’ असे कम्युनिस्ट पक्षाचे (माले) सरचिटणीस दीपंकर म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाचा सर्वात महत्त्वाचा फोन मुर्मू विसरतात तेव्हा… राष्ट्रपतींवरील पुस्तकात दावा

विरोधकांची बैठक म्हणजे ‘फोटो सेशन’

‘पाटणा येथे नुकतीच झालेली विरोधी नेत्यांची बैठक ‘फोटो सेशन’ होती,’ अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी केली. येथील ‘नवसंकल्प सभे’ला संबोधित करताना ते बोलत होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाला गती दिली; तसेच घराणेशाही आणि मतपेढीचे राजकारण संपवले,’ असेही नड्डा म्हणाले. ‘राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, तृणमूल आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना (उबाठा) हे सर्वच पक्ष त्यांचे घराणेशाहीचे राजकारण वाचवू पाहत आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भ्रष्टाचारात बुडाले असून, त्यांचे कुटुंब तेलंगणला पुढे नेण्यापेक्षा स्वत: कसे पुढे जाता येईल ते पाहत आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

[ad_2]

Related posts