Delhi Flood Alert,दिल्लीत आरोप-प्रत्यारोपांचाही महापूर; भाजप अन् आपच्या नेत्यांची परस्परांवर यथेच्छ चिखलफेक – accusations between bjp and aap leaders over delhi floods

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : दिल्लीतील हजारो गोरगरीब यमुना नदीच्या पुराशी झगडत असतानाच भाजप आणि सत्तारूढ आम आदमी पक्ष यांच्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. मंत्री, नेते पुरापासून सुरक्षित ठिकाणी बसून परस्परांवर यथेच्छ चिखलफेक करीत आहेत. भाजपशासित हरयाणाने हथिनी कुंडमधील पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यानेच दिल्ली जलमय झाल्याचा आरोप ‘आप’ नेते करीत आहेत. ‘दिल्लीच्या मंत्र्यांनी केंद्राकडून मिळालेला नालेसफाई व पूर निर्मूलनाचा निधी स्वतःच्या जाहिरातबाजीसाठी वापरल्याने दिल्लीकरांचे हाल झाले,’ असा भाजपचा प्रत्यारोप आहे.

दिल्ली पुराच्या मुद्द्यावरून केजरीवाल व ‘आप’च्या मंत्र्यांनी केंद्र सरकार आणि नायब राज्यपालांना घेरले असताना आरोप करण्याऐवजी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रामाणिकपणे कामाला लागण्याचा सल्ला भाजप नेत्यांनी ‘आप’ला दिला. ‘आप सरकार काहीही काम न करता केवळ दोषारोप करत आहेत. केजरीवाल यांचे मंत्री ‘एनडीआरएफ’लाही सोडत नाहीत,’ असे भाजपने म्हटले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मीनाक्षी लेखी, खासदार गौतम गंभीर, प्रवेश वर्मा, मनोज तिवारी आदींनी केजरीवाल सरकारविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे.

दिल्लीतील या संकटाच्या परिस्थितीसाठी एकमेकांकडे बोटे दाखवणे आणि दोष देण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन केजरीवाल यांनी शनिवारी केले. ते म्हणाले, ‘या नैसर्गिक संकटात माणसाने माणसाला मदत केली पाहिजे. एकमेकांना शिव्या देऊन उपयोग नाही. भाजप नेते कालपासून मला शिव्या देत आहेत. त्यांना ते करू द्या, त्याची पर्वा मला नाही. आमचे मंत्री २४ तास पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिल्लीच्या जलमय रस्त्यांवर आहेत.’

भाजप नेते शाम जाजू म्हणाले, ‘ज्याप्रमाणे करोनाच्या संकटातही केजरीवाल आपली जबाबदारी पार पाडण्याऐवजी आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकले, त्याचप्रमाणे या आपत्तीच्या काळातही ते आपली जबाबदारी टाळण्याचाच प्रयत्न करत आहेत. दिल्ली सरकारकडून आपत्तीला तोंड देण्याची कोणतीही तयारी नसल्याचे स्पष्ट होते. ‘असा संवेदनाहीन व निष्क्रिय मुख्यमंत्री दिल्लीत आजपर्यंत कोणी पाहिला नाही,’ असा आरोप भाजपचे आमदार अजय महावर यांनी केला.

भाजपशासित हरयाणाने हथिनी कुंडमधील पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यानेच दिल्ली जलमय झाली.- आप नेत्यांचा आरोप

दिल्लीच्या मंत्र्यांनी केंद्राकडून मिळालेला नालेसफाई व पूर निर्मूलनाचा निधी स्वतःच्या जाहिरातबाजीसाठी वापरल्याने दिल्लीकरांचे हाल झाले.- भाजप नेत्यांचा आरोप

[ad_2]

Related posts