रेल्वे बोर्डात प्रथमच अध्यक्षपदी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती; कोण आहेत जया वर्मा सिन्हा?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी आणि सीईओपदी प्रथमच केंद्र सरकारने जया वर्मा सिन्हा या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

बालासोर रेल्वे अपघातात ३०० जण मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना घडल्यानंतर वर्मा यांनी रेल्वेच्या जटील अशा सिग्नल यंत्रणेबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली होती. तेव्हा त्या ‘ऑपरेशन्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट’ विभागाच्या सदस्य होत्या. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती केल्याचे रेल्वे बोर्डाने आदेशातरेल्वे बोर्डात प्रथमच अध्यक्षपदी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती; कोण आहेत जया वर्मा सिन्हा?नमूद केले आहे. जया वर्मा सिन्हा या १ सप्टेंबरला रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट, २०२४पर्यंत असेल.

केंद्र सरकार अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्कार देणार नाहीत, आम्ही जनतेकडून हा पुरस्कार देतो : ममता बॅनर्जी

अलाहाबाद विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सन १९८८मध्ये भारतीय रेल्वेच्या वाहतूक विभागात रूजू झाल्या. त्यानंतर त्यांनी उत्तर रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व रेल्वे विभागात काम केले आहे. त्यांनी बांगलादेशातील ढाका येथे भारतीय उच्चायुक्तालयात रेल्वे सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे.

[ad_2]

Related posts