[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
स्रिजाला तीन मुलं पहिल्या लग्नापासून झाली होती. मृत पती-पत्नीचा विवाह १६ महिन्यांपूर्वी झाला होता, अशी माहिती स्रिजाचे शेजारी राहणाऱ्या चेरुवाथुर यांनी दिली. शाजीची एक दुसरी पत्नी असून तिच्यापासून त्याला दोन मुलं आहेत. मृतदेह आढळून आलेलं घर स्रिजाच्या पहिल्या पत्नीचं असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं.
शाजी आणि स्रिजा यांच्यात दररोज वाद व्हायचे. त्याबद्दलच्या अनेक तक्रारी चेरुपुज्हा पोलीस ठाण्यात आहेत. पती, पत्नीनं आधी मुलांना संपवून त्यांचे मृतदेह पंख्याला लटकवले आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली, असा संशय पोलिसांना आहे. फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळाचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीतही केरळमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली होती. कौटुंबिक वादांना कंटाळून त्यांनी जीवन प्रवास थांबवला. चारही जणांनी भरतपुझा नदीत उडी घेत जीव दिला. आपण आयुष्याची अखेर करण्यासाठी जात असल्याचं त्यांनी नातेवाईकांना सांगितलं होतं. चार मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश होता.
[ad_2]