Vasai virar to recieve regular water supply from october mmrda assures thackeray group delegation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वसई-विरारला अतिरिक्त पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम जूनमध्येच पूर्ण झाले. अद्याप या प्रकल्पातून वसई-विरारकरांना पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयावर मोर्चा काढला.

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील काही कामे अद्याप बाकी असून पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरपासून वसई-विरारला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले.

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे. MMRDA ने L&T या कंत्राटदारामार्फत 2017 मध्ये सुमारे 1977.29 कोटी रुपये खर्चून या प्रकल्पाचे काम सुरू केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वसई-विरार परिसराला दररोज 185 दशलक्ष लिटर आणि मीरा-भाईंदरला दररोज 218 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जाईल.

पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी वेळही मागत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांना अद्याप मुहूर्त मिळत नसल्याने पहिल्या टप्प्यातील लोकार्पण पर्याय म्हणून पाणीपुरवठा सुरू झाला नसल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी वांद्रे येथील एमएमआरडीएच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त २ अश्विन मुदगल यांची भेट घेऊन पहिला टप्पा लवकरात लवकर राबविण्याची मागणी केली.

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील काही कामे बाकी आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नवरात्रोत्सवापर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन मुदगल यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सुनील शिंदे यांनी दिली.

एमएमआरडीएने हे आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही शिंदे यांनी दिला.


हेही वाचा

[ad_2]

Related posts