[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
डॉक्टरांनी स्मशानभूमीजवळ धाव घेतली आणि तपासणी केली. त्यावेळी संबंधित व्यक्तीचे हृदय अजूनही धडधडत असल्याची पुष्टी त्यांनी केली. अर्थात ‘मयत’ समजल्या गेलेल्या व्यक्तीचे ब्लड प्रेशर आणि पल्स नियमित होते. त्यानंतर त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जीतू प्रजापती नावाचा तरुण बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. मंगळवारी सायंकाळी तो अचानक जागच्या जागी कोसळला. काही लोकांनी त्याच्या नाक आणि तोंडाजवळ बोटं ठेवून त्याचा श्वास तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा श्वास न जाणवल्याने त्यांनी जीतूचा मृत्यू झाल्याचा समज करुन घेतला.
जेव्हा जीतू जिवंत नाही, असं त्यांना वाटलं, तेव्हा त्यांनी त्याच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना एकत्र केलं. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु केली. शांती धाम स्मशानभूमीपर्यंत त्याचा ‘शेवटचा प्रवास’ही झाला, मात्र जिथे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याची चिता रचण्यात आली होती, तिथेच अचानक त्याची मृतदेहाची हालचाल झाली.
सुरुवातीला भूतप्रेताचा प्रकार असल्याच्या समजातून तिथे उपस्थित नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी पळ काढला, मात्र आपला जीतू खरंच जिवंत आहे, हे लक्षात येताच त्यांनी डॉक्टरांना पाचारण केले. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
[ad_2]