India Alliance Meeting Cancle Due To Michong Cyclone Heavy Rain Maharashtra Politics News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट झालं आहे. आता मिचाँग चक्रीवादळामुळे (Michong Cyclone) इंडिया आघाडीची बुधवारी होणारी दिल्लीतील बैठक (I.N.D.I.A Alliance Meeting) रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने  (Congress) दिली आहे. सुरुवातीला ममता बँनर्जी आणि नितीश कुमार या बैठकीला अनुपस्थितीत राहणार नसल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तामिळनाडूचे स्टॅलिनही गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली असून ती 18 किंवा 19 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत इंडिया अलायन्सची बैठक होणार होती. काँग्रेसने ही बैठक बोलावली असून त्यात विरोधी पक्षांचे बडे नेते सहभागी होणार होते. मात्र आता अनेक नेते उपस्थित न राहिल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

इंडिया आघाडीतील घटक पक्ष नाराज

वास्तविक, पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला झाला. तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या हिंदी बेल्ट असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव स्वीकारावा लागला आहे.

या निवडणुकीत इंडिया आघातील घटक पक्षांना काँग्रेसने विश्वासात घेतलं नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच नितीश कुमार, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी नाराज आहेत. तसेच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं. मिचॉंग चक्रीवादळामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही असं स्टॅलिन यांनी कळवल्याचं काँग्रेसने सांगितलं. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली आहे. 

अनौपचारिक बैठक होणार 

बुधवारी होणाऱ्या बैठकीला जरी मोठे नेते उपस्थित राहू शकणार नसले तरीही त्या ठिकाणी आता एक अनौपचारिक बैठक होणार असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. 

उलटसुलट चर्चांना उधाण

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीस तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ममता बॅनर्जी यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. उत्तरेकडील भागात आधीच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी ममता बॅनर्जींना उपस्थित रहावं लागणार आहे. तसंच इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल त्यांना आधी माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे याकाळात त्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत.  

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts