Odisha Train Accident Balasore Coromandel Express Accident Bihar Man Died After Last Wish Was Fulfilled; माझ्या भावाशी बोलणं करुन द्या… अखेरची इच्छा पूर्ण होताच ट्रेनमध्येच ललितने प्राण सोडले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भुवनेश्वर: माझ्या भावासोबत माझं बोलणं करुन द्या… ही ललित ऋषीदेव यांची अखेरची इच्छा होती. ओडिशा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २८८ लोकांपैकी २२ वर्षीय ललित हा एक प्रवासी होता जो कोरोमंडल ट्रेनमध्ये प्रवास करत होता. पण, हा प्रवास त्याच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास असेल याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. बिहारमधील पूर्णिया येथील रहिवासी असलेल्या ललितला चेन्नई येथे मजूर म्हणून नोकरी मिळाली होती. त्यासाठी तो चेन्नईला जायला निघाला होता.

त्याने नोकरीसाठी घर सोडले पण जिथे पोहोचण्यासाठी तो घरातून निघाला तिथे पोहोचलाच नाही. बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात ललित गंभीर जखमी झाला होता. जेव्हा त्याला रेस्क्यू करण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. कदाचित त्याला त्याचा मृत्यू समोर दिसत होता. म्हणून त्याने बचावकर्त्याला सांगितलं की कृपया माझं माझ्या लहान भावाशी बोलणं करुन द्या.

Odisha Accident: कोरोमंडल १२८ च्या वेगाने धडकली अन् डबे पत्त्यासारखे विखुरले; रेल्वेने सांगितलं अपघाताचं कारण
त्यानंतर बचावकर्त्याने तत्काळ ललितचा मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्याचा मोबाईल सापडला आणि ललितचा भाऊ मिथुन ऋषिदेव याला फोन लावण्यात आला. पण, ललित आपल्या भावाशी काहीच मिनिटं बोलू शकला. त्यानंतर त्याचा तिथेच मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूची बातमी समजताच मिथुन ढसाढसा रडू लागला. या घटनेने त्याच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावला, तीन सख्ख्या भावांचा मृत्यू
ललितचा मृतदेह सापडला नाही

भावाचा मृतदेह घेण्यासाठी मिथुन रविवारी कुटुंबासह बालासोरला पोहोचला. तेव्हा ललितचा मृतदेह शोधण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. ललितचा मृतदेह कुठे आहे हे त्यांना कळत नव्हतं. इतक्या मृतदेहांमध्ये ललितचा मृतदेह शोधणे फार कठीण होते. अखेर काही वेळाने ललितचा मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.

‘माणुसकीचा झरा’; रेल्वे अपघातानंतर रक्तदानासाठी लोकांची रांग

रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू

ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी तीन गाड्यांच्या झालेल्या भीषण धडकेत आतापर्यंत २८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. बचाव आणि मदत कार्यानंतर, रेल्वेने शनिवारी रात्रीच रुळांवरचा बहुतांश ढिगारा हटवला असून लवकरच ट्रॅक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १००० हून अधिक कर्मचारी सतत काम करत आहेत.

[ad_2]

Related posts