Manoj Jarange Strick On Maratha Reservation Maharashtra Politics Ultimatum To Maharashtra Government ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Manoj Jarange : 3 कोटी मराठे मुंबईत येणार, मनोज जरांगेंचा दावा,  20 जानेवारीपासून आमरण उपोषण 
बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निर्णायक लढा पुकारला आहे. बीडमध्ये आज (23 डिसेंबर) मनोज जरांगे पाटील यांनी अनेक सामाजिक राजकीय घटनांचा अभेद्य साक्षीदार असलेल्या मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानातून मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाची घोषणा करतानाच स्वत: त्यांच्या आंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. 
तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही

बीडमधील झालेल्या इशारा सभेत नव्या वर्षातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. जातीपेक्षा मोठा नेता मानू नका,आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जावून बसा, असं आवाहन त्यांनी महिलांना केलं. सरकारने दहा बारा दिवस मिळत आहेत ते बघावेत. एकदा अंतरवलीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

[ad_2]

Related posts