Crima News : फोनवर बोलण्यात भलताच गुंग अन् हातात हिटर असतानाच खटका चालू केला; करंट लागून जाग्यावर जीव गेला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>नोएडा :</strong> उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा येथील सेक्टर-39 पोलीस स्टेशन हद्दीतील सदरपूर कॉलनीत फोनवर बोलत असताना वॉटर हिटिंग रॉडचा विद्युत शॉक लागून एका 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. मृत अल्पवयीन मोबाईल फोनवर कोणाशी तरी बोलत होता, त्याच दरम्यान त्याने हातात पाणी तापवणारा रॉड घेतला आणि इलेक्ट्रिक प्लग चालू केला त्यामुळे विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला.</p>
<h2 style="text-align: justify;">पाण्याच्या बादलीत वॉटर हिटिंग रॉड ठेवलेला नाही हे देखील विसरला!</h2>
<p style="text-align: justify;">सेक्टर 39 पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जितेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, सदरपूर कॉलनीत राहणारा देव रविवारी रात्री मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता. दरम्यान, तो आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी गेला. किशोर फोनवर बोलण्यात इतका व्यस्त होता की त्याने पाण्याच्या बादलीत वॉटर हिटिंग रॉड ठेवला नव्हता हे देखील तो विसरला.</p>
<h2 style="text-align: justify;">रॉड हातात घेतला आणि तो इलेक्ट्रिक प्लगला जोडला</h2>
<p style="text-align: justify;">सिंह यांनी सांगितले की, किशोरने रॉड हातात घेतला आणि तो इलेक्ट्रिक प्लगला जोडला आणि तो चालू केला. त्यामुळे या तरुणाला विजेचा धक्का लागल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<h2 style="text-align: justify;">दोन दिवसांपूर्वी मी माझ्या पतीला विजेचा धक्का दिला, मला अटक करा!&nbsp;</h2>
<p style="text-align: justify;">दुसरीकडे, अवघ्या पाच दिवसांपूर्वीच आग्र्यात एका महिलेने पतीला विद्युत प्रवाहाने मारल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर मृतदेह दोन दिवस खोलीत लपवून ठेवला. यानंतर स्वतः पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली. महिलेने आपला गुन्हाही कबूल केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना समजल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना धक्का बसला. सध्या पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.</p>
<p style="text-align: justify;">मूळचा बर्हान येथील रहिवासी असलेला नीरज हा सदर भागातील मुस्तफा क्वार्टर्समध्ये 38 वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत होता. तो रेल्वे स्टेशनवर विक्रेता होता. त्याची पत्नी प्रीती आणि त्याच्या दोन मुली (मोठी 8 वर्षे आणि धाकटी 6 वर्षे) त्याच्यासोबत राहत होत्या. प्रितीने पोलिसांना फोन करून पतीची हत्या केल्यामुळे तिला अटक करण्यास सांगितले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता नीरजचा मृतदेह आढळून आला. नीरजचे पाय दोरीने बांधले होते. त्याच्या पायाला विजेचा शॉक लागला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, नीरजला दारू पिण्याचे व्यसन होते. या कारणावरून त्यांच्या घरात पती-पत्नीमध्ये दररोज वाद होत होते.</p>
<p style="text-align: justify;"><strong>इतर महत्वाच्या बातम्या&nbsp;</strong></p>
<ul>
<li class="article-title " style="text-align: justify;"><strong><a href="https://marathi.abplive.com/news/india/lok-sabha-election-2024-opinion-poll-abp-news-cvoter-survey-india-or-nda-bjp-vs-congress-maharashtra-marathi-news-1240658">Lok Sabha Survey : आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर इंडिया की NDA, कोण बाजी मारणार? सी-व्होटरच्या ओपिनियन पोलवरून समोर आली मोठी बातमी</a></strong></li>
</ul>

[ad_2]

Related posts