[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल करण्यात आलीय.. बालासोरमधील ट्रेनचा अपघात नसून घातपात असण्याची धक्कादायक शक्यता आता समोर आली आहे. Rail Relay Interlocking Systemमध्ये कुणीतरी जाणूनबुजून चुकीचा बदल केला, ज्यामुळे कोरोमंडळ एक्स्प्रेस मालगाडीच्या ट्रॅकवर गेली, असं संशय वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. याचं कारण म्हणजे Interlocking System यंत्रणा ही जागतिक पातळीवर नावाजलेली, आणि १०० टक्के सुरक्षित यंत्रणा आहे. एखाद्या ठिकाणी जर ट्रेन उभी असेल, तर त्याच ठिकाणी दुसऱ्या ट्रेनला जाण्याची परवानगी ही यंत्रणा देऊच शकत नाही. आणि म्हणूनच, कोरोमंडल एक्सप्रेसला मालगाडीच्या ट्रॅकवर कुणी वळवलं, हा कळीचा मुद्दा आहे, आणि नेेमकं याच कारणानं रेल्वेनं सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. </p>
[ad_2]
CBI registers case Balasore Train Accident : बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/3f97aaa58bfa7a26a2e341945f91a64d1686051845171308_original.jpg)