नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यापालांकडे दिला, नव्या सरकारचा आजच होणार शपथविधी 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यापालांकडे सुपूर्द केला आहे. तसेच भाजप आणि जेडीयूच्या सरकारचा आजच शपथविधी होणार आहे. बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं. पण या महाआघाडीच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय नितीश कुमार यांच्याकडून घेण्यात आला आहे. नितीश कुमार यांच्यसह भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सत्तापालटली असून राज्य सरकारची समिकरणं पुन्हा बदलली आहेत. तसेच आता  नितीश कुमार हे 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांच्यासह 9 मंत्री या शपथविधी सोहळ्यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. त्यामुळे आता बिहारमधील राजकीय घडामोडींना बराच वेग आलाय. याचसाठी बिहारचे प्रभारी विनोद तावडे देखील पोहचले होते. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील बिहारमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आलीये. 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts