परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं, विद्यार्थ्यांने आठव्या माळ्यावरुन उडी मारुन संपवलं जीवन

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुत 19 वर्षाच्या विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या इमारतीवरुनच उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. BTech (computer science) चं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं होतं. तो कॉपी करण्याचा प्रयत्न करत होता असं दिसत होतं. दरम्यान यानंतर शिक्षकांनी पालकांना बोलावल्याने घाबरलेल्या विद्यार्थ्याने आठव्या माळ्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवलं.  आदित्य प्रभू असं या विद्यार्थ्याचं नाव असून, तो मंगळुरुचा आहे. कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आदित्य प्रभू याला परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं होतं. तो पहिल्या सेमिस्टरचा विद्यार्थी होता.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “सकाळी 11.30 वाजता आदित्य…

Read More