[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
रविवारी (१४ मे) रात्री म्हणजेच मातृ दिनाला शशिकांतच्या तिसर्या पत्नीने त्याला फोन केला आणि म्हटलं की, एकतर मुलगा तुझ्यासोबत राहिल किंवा मी राहिल. यावरून या पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं.
रात्री वडिलांसोबत झोपला, सकाळी मृतावस्थेत आढळला
मुलाने या दोघांमधील वाद मोठ्या वडिलांना सांगितला. त्यानंतर तो परत खोलीत आला वडिलांसोबत झोपी गेला. यानंतर शशिकांत सकाळी घरातून गायब झाला. बराच वेळ प्रतिकची काहीच हालचाल झाली नाही. तो घरात कुठेच दिसला नाही, म्हणून त्याची आजी खोलीत त्याला बघायला गेली. तेव्हा त्यांना खोलीत बेडवर प्रतिकचा मृतदेह आढळून आला.
नातवाला मृत पाहताच आजीने हंबरडा फोडला. त्यांचा आरडाओरड ऐकून कुटुंबातील सदस्य जमले. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. प्रतिकच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रतिकचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पोलिस अतिरिक्त डीसीपी जयवीर सिंह भदोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमधील वादानंतर वडिलांनी आपल्या ७ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला आणि पळून गेला. तो कोणत्या वाहनातून पळून गेला याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग करुन अलर्ट जारी केला आहे. लवकरच आरोपी पित्याला अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. यासोबतच या प्रकरणातील महिलेची भूमिका तपासली जाणार आहे. दोषी आढळल्यास तिलाही अटक केली जाईल.
[ad_2]