[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, मुलीचा मोबाईल काढून घेतल्यामुळे ती नाराज होती. ती अद्याप अल्पवयीन आहे. पण सोशल मीडियावर ती खूप मित्रांशी बोलत होती. त्यामुळे तिचा मोबाईल घेऊन तिला ओरडल्यामुळे ती रागात होती आणि यातूनच तिने आईला ठार मारण्याचं प्लॅनिंग केल्याचं, महिलेने पोलिसांत सांगितलं. दरम्यान, महिलच्या तक्रारीवरून अभयम १८१ महिला हेल्पलाइनच्या समुपदेशकाने मुलीची चौकशी केली आणि यामध्येही धक्कादायक माहिती समोर आली.
आईला संपवून तिला पालकांना दुखवायचं होतं. कारण, त्यांनी माझा मोबाईल काढून घेतला, असं तिने पोलिसांना सांगितलं. यामुळे, कीटकनाशके घातलेली साखर खावी किंवा जमिनीवर घसरून आपटावे, अशी तिची इच्छा होती. मुलीच्या आईने काही दिवसांपूर्वी तिचा फोन हिसकावून तिला मारहाण केली होती. त्याच वेळी, तरुणीच्या पालकांनी सांगितले की, मुलगी जवळजवळ संपूर्ण रात्र फोनवर घालवायची. ती ऑनलाइन मित्रांशी गप्पा मारायची किंवा सोशल मीडियावर रील्स किंवा पोस्ट पाहण्यात वेळ घालवायची. त्यामुळे त्यांचा अभ्यास आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत होतं.
हे सत्य समोर आल्यानंतर मुलीच्या पालकांना धक्काच बसला. कारण, त्यांनी स्वप्नातही अशा घटनेचा विचार केला नव्हता. समुपदेशकांनी सांगितले की, त्यांना अधिक आश्चर्य वाटला कारण त्यांनी मुलीला सांभाळण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. जी त्यांच्या लग्नाच्या १३ वर्षांनंतर जन्माला आलेली एकच मुलगी आहे.
[ad_2]