[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
प्रयागराजमध्ये प्रशिक्षण घेतलं…
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या चिराई गावात २०१० मध्ये त्याचे लग्न ज्योतीसोबत झालं होतं. लग्नानंतर पुढील शिक्षण सुरू ठेवण्याची ज्योतीने इच्छा होती. त्यामुळे पती आलोकने आपल्या कमाईतून ज्योतीला शिकवलं. इतकंच नाहीतर त्याने आपल्या पत्नीला प्रयागराजमधील एका चांगल्या कोचिंग सेंटरमध्ये दाखल केले जेणेकरून उद्याला मोठ्या पदावर काम करेल. पण पुढे वेगळंच घडलं.
सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप
ज्योती आणि आलोक या दोघांना २०१५ साली जुळ्या मुली झाल्या होत्या. त्याच दिवशी PCS परीक्षेचा निकालही आला आणि PCS मध्ये ज्योतीची निवड झाली. सर्व घरात आनंदाचं वातावरण होतं. ज्योतीने याचे श्रेय पती आलोक मौर्य आणि सासरच्या मंडळींना दिलं होतं. मात्र, काही दिवसांनी अधिकारी झालेल्या पत्नी ज्योती मौर्या पतीच्या विरोधात गेली. ज्योती मौर्याने पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला होता.
२०२० मध्ये मनीषला भेटली अन्….
आलोक आणि ज्योती यांचं वैवाहिक जीवन चांगलं सुरू असतानाच २०२० मध्ये ज्योतीची भेट होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांच्याशी झाली. आलोकच्या म्हणण्यानुसार, ज्योती आणि मनीषची ओळख झाल्यापासून ती त्याच्यापासून दूर गेली. आलोक मौर्य यांचा आरोप आहे की, जेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीचा संशय आला तेव्हा त्यांनी तिचा मोबाईल तपासला. यामध्ये मनीष दुबे आणि पत्नी ज्योतीचे धक्कादायक चॅटिंग समोर आले. इतकंच नाहीतर दोघांनाही रंगेहात पकडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
[ad_2]