[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शरद पवार यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. तसंच तेच पक्षाचे अध्यक्ष असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यावेळी भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले लोकप्रतिनिधी आणि नेत्यांवरही कठोर कारवाई करण्यात आल्याचं कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलं. पक्षातून सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच एस. आर. कोहली यांचं निलंबन करण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळात सामील झालेल्या नऊ मंत्र्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीवर अजित पवार गटाकडून दावा सांगितला जात असतानाच शरद पवार यांनी दिल्लीत दाखल होत शक्तिप्रदर्शन केलं असून राष्ट्रवादी पक्ष आपल्याकडेच राहावा, यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं दिसत आहे.
बैठकीनंतर काय म्हणाले शरद पवार?
– राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची फूट नाही, सत्तेत सहभागी झालेल्यांवर निलंबनाची कारवाई
– कोणाला मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधान-उपपंतप्रधान व्हायचं असेल तरीही त्याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही
– कोणीही काहीही दावा करत असलं तरीही पक्षसंघटना आमच्यासोबतच राहणार
– निवडणूक आयोगावर आमचा विश्वास, त्यामुळे आम्ही लगेच सुप्रीम कोर्टात जाणार नाही
– आयोगाने कायद्याला धरून निर्णय न दिल्यास दुसरा पर्याय आम्हाला शोधावा लागणार
– राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर ती चांगली गोष्ट
– महाराष्ट्रात २०२४ मध्ये जनता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे सत्ता देईल
[ad_2]