मुंबई महापालिका निवडणुका ऑगस्टपर्यंत होणार नाहीत, वॉर्ड फेररचनेवर आता थेट ऑगस्ट महिन्यात सुनावणी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BMC Election : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वॉर्ड संख्येबाबत सुप्रीम कोर्टातलं (Supreme Court) प्रकरण थेट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीसाठी येणार आहे. त्यामुळे बीएमसी महापालिका निवडणुका (BMC Election) तोपर्यंत लागणार नाहीत हे देखील स्पष्ट झालं आहे. सुप्रीम कोर्टाने आज वॉर्ड संख्येतील बदलाबाबत बीएमसी आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे

92 नगर परिषदांसंदर्भात जे प्रकरण प्रलंबित आहे त्यासोबत हे प्रकरण जोडण्याची विनंती करण्यात आली होती पण कोर्टाने ही याचिका स्वतंत्र ठेवली आहे

बीएमसी वार्ड संख्या 227 वरुन ठाकरे सरकारने 236 केली तर शिंदे फडणवीस सरकारने की पुन्हा 227 केली. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे

[ad_2]

Related posts