Thane News Mohan Bhagwat Says Lots Of Good Things Happen In A Country But Only Bad Things Get More Publicity; मोठी बातमी: देशात ४० पट चांगलं काम सुरु, पण वाईट गोष्टींनाच जास्त प्रसिद्धी मिळते: मोहन भागवत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: देशात विविध घटनांवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठत असतानाच रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी टीकाकारांचे कान टोचले. ‘देशात जितक्या वाईट गोष्टींची चर्चा होते, त्यापेक्षा चाळीस पट अधिक चांगल्या गोष्टी घडत आहेत. याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चांगला असायला हवा,’ अशा शब्दांत त्यांनी या टीकाकारांना खडे बोल सुनावले. देशात जे वाईट घडते त्याची चर्चा अधिक होते, परंतु देशात ४० पट अधिक चांगले काम सुरू आहे. मी हे फिरताना बघतो, पण ज्यांचे डोळे आणि कान उघडे आहेत, त्यांना ते दिसते. अनेक जण नि:स्वार्थ भावनेतून चांगले काम करीत आहेत. ठाण्यातील कर्करोग रुग्णालय हे त्यापैकीच एक काम आहे, असे त्यांनी म्हटले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंसा अमान्य,मुसलमान, ख्रिश्चनांनाही विरोध नाही, मोहन भागवतांची स्पष्टोक्ती

त्याचवेळी ‘अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा जितक्या आवश्यक आहेत. कदाचित त्यापेक्षा अधिक आज सर्वसामान्यांना शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेची गरज आहे. नागरिक घरदार विकून मुलांना शिकवतात, आपले उपचार चांगल्या रुग्णालयात करतात. मात्र, या दोन्ही बाबींच्या सुविधा आपल्या देशात अपुऱ्या आहेत,’ अशी खंत व्यक्त करतानाच, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. शतकपूर्ती होईल, तेव्हा देश स्वयंपूर्ण असेल, असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला. अनेक शतकांपासून आपला देश जगातल्या मागास आणि दबावात असलेल्या राष्ट्रांपैकी एक म्हणून ओळखला जात होता. स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होत असताना, आपला देश विश्वाचा मुकुट व्हावा, असेही त्यांनी म्हटले.

RSS Chief मोहन भागवत यांचा फोटो स्टेटस ठेवल्याने दिली धमकी, लवकर फोटो काढ नाही तर…

ठाणे महापालिका, जितो एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या विद्यमाने ठाण्यातील बाळकुम परिसरात उभारण्यात येणाऱ्या ६०० खाटांच्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भागवत यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना मुंबईत असलेल्या कॅन्सर रुग्णालयामुळे नागरिकांना मोठा आधार आहे. मात्र, तिथे लांबून येणाऱ्या नागरिकांना राहण्याची सुविधा नाही, त्यामुळे ठाण्यात होत असलेल्या रुग्णालयामुळे नागरिकांचे कल्याण होणार असल्याचे सांगितले. आजच्या काळात चांगले आरोग्य आणि शिक्षण हवे आहे. मात्र, हे हवे असेल तर त्या सुविधा आपल्या देशात अपुऱ्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे, असेही भागवत म्हणाले. ज्या पद्धतीने आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्याला सध्याची जीवनशैली जबाबदार आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी दादा भगवान फाउंडेशनचे दीपक देसाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, टाटा कॅन्सर रुग्णालयाचे डॉ. शैलेश श्रीखंडे, ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर, जितो फाउंडेशनचे विश्वस्त अजय आशर आदी उपस्थित होते.

भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट, अजित पवारांचा झुकून सरसंघचालकांना नमस्कार

[ad_2]

Related posts