[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. अपघातातील जखमींना मदत करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. डांगुरु योजनेजवळील दुर्घटनेसंदर्भात किश्तवाडचे जिल्हाधिकारी डॉ. देवांश यादव यांच्याशी चर्चा केल्याचं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून एक जणाचा मृत्यू झाला आहे.
जितेंद्र सिंह याांनी सर्व जखमींना आवश्यकतेनुसार किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. किश्तवाडमधील डोडो येथील जीएमसी रुग्णालयात जखमीवर उपचार करण्यात येत होते. गरजेनुसार त्यांना मदत केली होती, असं ते म्हणाले.
प्राथमिक माहितीनुसार अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये वीज प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अपघातातील जखमींना आवश्यक ती मदत केली जाईल अशी माहिती दिली.
सैन्य दलाचं हेलिकॉप्टर पण दुर्घटनाग्रस्त झालेलं…
किश्तवाडमध्ये सैन्य दलाचं हेलिकॉप्टर देखील दुर्घटनाग्रस्त झालं होतं. किश्तवाडमध्ये आज झालेला अपघात हा काही पहिला अपघात नाही. यापूर्वी चिनाब नदीमध्ये भारतीय सैन्य दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. त्यामध्ये एका फ्लाइट टेक्निशिअनचा मृत्यू झाला होता. तर, दोन पायलट जखमी झाले होते. सैन्य दलाच्या माहितीनुसार फ्लाइट टेक्निशिअन अनिलचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.
दरम्यान, या अपघातातील वाहन नेमक्या कोणत्या कारणानं दरीत कोसळलं याची माहिती समोर आलेली नाही. वाहन थेट दरीत कोसळल्यानं ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांच्या नावांसदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं होत.
[ad_2]