INDIA Alliance First Challenge To Win Ghosi Bye Election Against BJP; इंडिया आघाडीची पहिली परीक्षा, घोसी पोटनिवडणुकीत भाजपचं आव्हान, कोण बाजी मारणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, लखनऊ : उत्तर प्रदेशमधील घोसी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी आणि भाजप पहिल्यांदाच समोरासमोर येत आहेत. मंगळवार, ५ सप्टेंबरला ही निवडणूक होत असून, ८ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे. आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी दोन्ही बाजूंचे नेते जिकिरीचे प्रयत्न करत आहेत.

घोसी मतदारसंघातून २०२२मध्ये समाजवादी पक्षाच्या (सप) तिकिटावर विजयी झालेल्या दारासिंह चौहान यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला व आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे इथे पोटनिवडणूक होत आहे. भाजपने यावेळीही चौहान यांनाच उमेदवारी दिली आहे, तर ‘सप’ने सुधाकर सिंह यांना रिंगणात उतरवले आहे.
IND v PAK सामना रद्द झाल्यावर भारत आता सुपर-४ मध्ये कसा पोहोचणार, जाणून घ्या समीकरण…
२०२४ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून निर्माण झालेल्या ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष एकजुटीच्या भावनेने कामाला लागले आहेत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी ‘सप’च्या सिंह यांना केवळ पाठिंबाच दिला नसून, ते त्यांचा प्रचारही करत आहेत. तर, उत्तर प्रदेशात फार मोठी ताकद नसली तरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ही सिंह यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. विशेष म्हणजे, ‘सप’चे प्रमुख अखिलेश यादव स्वत: प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. मागील वर्षी त्यांनी रामपूर आणि आझमगढ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नव्हता, तर भाजपने दोन्ही मतदारसंघांमध्ये आक्रमक प्रचार केला होता. परिणामी एकेकाळी ‘सप’चा बालेकिल्ला असलेल्या या दोन्ही ठिकाणी पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. ही पुनरावृत्ती टाकळण्यासाठी अखिलेश घोसीमध्ये जोरदार प्रचार करताना दिसत आहेत.
टीम इंडियाचा बडा खेळाडू मायदेशी परतला,आशिया कपमधील नेपाळ विरोधातील मॅचपूर्वी मोठी घडामोड, कारण समोर

योगीही प्रचाराच्या मैदानात

दुसरीकडे भाजपकडून दस्तूरखुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे चौधरी यांच्या प्रचाराचे नेतृत्व करत आहेत. भाजपने कोणताही भेदभाव न करता नागरिकांसाठी काम केले आहे. मात्र, सप आणि काँग्रेसशी संबंधित लोकांना मतदारांची अजिबात चिंता नसून, त्यांनी मतदारसंघाऐवजी स्वतःच्या भरभराटीला सतत प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी प्रचारादरम्यान केला आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते देखील घोसीमध्ये तळ ठोकून आहेत. काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या आमदार रागिनी सोनकर देखील घोसीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत.

महायुतीचे संकटमोचक अंतरवाली सराटीत दाखल, गिरीश महाजनांकडून मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न , काय झाली चर्चा

इंडिया आघाडीचा प्रभाव देश आणि जनतेच्या विकासासाठी, प्रियंका चतुर्वेदींनी विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरलं!

[ad_2]

Related posts