Manipur Last 10 Kuki families Shifted From Imphal to Kangpokpi; इम्फाळमध्ये आता एकही कुकी उरला नाही, चिदंबरम म्हणाले, ‘वंशसंहार पूर्ण झाला’

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, इम्फाळ: मणिपूर सरकारने अखेरच्या १० कुकी कुटुंबांना इम्फाळच्या न्यू लॅम्बुलेन भागातून हलवले आहे. गेल्या अनेक दशकांपासून २४ कुकी कुटुंबे येथे राहात होती. चार महिन्यांपूर्वी जातीय हिंसाचाराचा उद्रेक होऊनही त्यांनी ही जागा सोडली नव्हती. मात्र असुरक्षित व सहज लक्ष्य होऊ शकण्याची भीती असल्याने त्यांना शनिवारी पहाटे इम्फाळ खोऱ्याच्या उत्तरेकडील कुकी-बहुल कांगपोकपी जिल्ह्यात नेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या १० कुकी कुटुंबांना इम्फाळपासून २५ किमी अंतरावर असलेल्या मोटबुंग येथे ‘सुरक्षित मार्गा’वरून नेण्यात आले. कुकी कुटुंबीयांनी मात्र त्यांना न्यू लॅम्बुलेन परिसरातील त्यांच्या घरातून मोटबुंग येथे जबरदस्तीने हाकलण्यात आल्याचा आरोप केला आहे. ‘गृह विभागाच्या निर्देशानुसार काम करत असल्याचा दावा करणारे गणवेशधारी सशस्त्र कर्मचाऱ्यांचे एक पथक शुक्रवारी मध्यरात्री इम्फाळ येथील न्यू लॅम्बुलेन येथे आले होते. त्यांनी इम्फाळमधील कुकी परिसरातील शेवटच्या उरलेल्या रहिवाशांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने हाकलले,’ असा दावा इम्फाळच्या मध्यवर्ती भागातील कुकी परिसराचे रक्षण करणाऱ्या स्वयंसेवकांपैकी एक असणाऱ्या एस. प्रिम. वायफेई यांनी केला.

कारगिल युद्धात देश वाचवला, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही; मणिपुरातील माजी सैनिकाची आपबिती

सुमारे ३०० आदिवासी कुटुंबे न्यू लॅम्बुलेन परिसरात राहत होती. मात्र ३ मे रोजी वांशिक हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून त्यांना टप्प्याटप्प्याने हे ठिकाण सोडावे लागले होते. ‘आमच्यापैकी २४ जणांना आमचे सामान बांधण्यासाठीही वेळ दिला गेला नाही आणि आम्हाला नेसत्या कपड्यांनिशी गाड्यांमध्ये कोंबण्यात आले,’ असा आरोप त्यांनी केला. कुकी कुटुंबांना ‘जबरदस्तीने’ इतरत्र नेण्यात आल्याबद्दल कुकी समाजाच्या कुकी इन्पि मणिपूर या संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. कुकी कुटुंबांचे संरक्षण करणाऱ्या स्वयंसेवकांवर केलेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला. या स्वयंसेवकांना नंतर सुरक्षा कर्मचारी घेऊन गेले, असा दावा त्यांनी निवेदनात केला आहे. तसेच, कुकी संघटनेने पुन्हा स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली आहे.

Rahul Gandhi Loksabha Speech: भारतमाता माझी आई, भाजपकडून तिचीच हत्या, मणिपूरवरुन संसदेत राहुल गांधी आक्रमक

‘वंशसंहार पूर्ण’

शेवटच्या कुकी कुटुंबांना इतरत्र ठिकाणी हलवल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ‘वंशसंहार पूर्ण झाला. या घटनेहून अधिक लाजिरवाणी बाब कुठली असू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेचा उल्लेख करून ‘याचा अर्थ जेथे मेइती समाजाचा दबदबा आहे, त्या इम्फाळ खोऱ्यातून वंशसहार पूर्ण झाला आहे. एक राज्य सरकार अशा ‘वंशसंहारा’चे नेतृत्व करत असताना केंद्र सरकारचा दावा आहे की, राज्य सरकार राज्यघटनेच्या तत्त्वानुसार कार्यरत आहे. भारताने अराजकतेच्या दिशेने पाऊल टाकून आणखी खालचा स्तर गाठला आहे,’ असे ते म्हणाले.

भारतीय सैन्य दोन दिवसात शांत करेल, पण मोदींना मणिपूर पेटतं ठेवायचंय राहुल गांधी

[ad_2]

Related posts