Bharat India Row Pakistan May Lay Claim On Name India If India Derecongnises It Officially At UN Level Said Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने इंडिया (India) या नावाऐवजी फक्त ‘भारत’ (Bharat) हे नाव वापरणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकार आता अधिकृतपणे इंडिया हे नाव वगळून भारत हेच नाव ठरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास पाकिस्तान इंडिया या नावावर आपला दावा सांगणार असल्याचे वृत्त आहे. ‘साऊथ एशिया इंडेक्स’ यांनी याबाबतचे ट्वीट केले आहेे. 

केंद्र सरकारने देशाचे नाव बदलल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघातही इंडिया ऐवजी भारत असे नाव बदलावे लागणार आहे.  असे झाल्यास पाकिस्तान हे इंडिया या नावावर दावा करणार असून तशी तयारी केली असल्याचे वृत्त साऊथ एशिया इंडेक्सने प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानमधील काही राष्ट्रवादी घटकांनी याआधीदेखील इंडिया हे नाव इंड्स प्रदेशावरून पडलं असल्याचे सांगत दावा केला होता. इंड्स हे नाव सिंधु नदीच्या खोऱ्यावरून पडले. त्याचेच पुढे इंड्सवरून इंडिया असे म्हटले जाऊ लागले. 

या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विविध मुद्दे मांडले आहेत. काहींनी पाकिस्तानची खिल्ली उडवली असून ऐतिहासिकदृष्ट्या पाकिस्तानचा दावा योग्य असल्याचेही काहींनी म्हटले आहे. 

राष्ट्रपतींच्या आमंत्रण पत्रिकेवरून चर्चांना उधाण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबर रोजी रात्र भोजनाचे आयोजन केले आहे. या आमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर हा देशाच्या नामांतराचा घाट आहे का अशी पहिली शंका काँग्रेसने घेतली. त्यानंतर इतर राजकीय पक्षांनी, विचारवंतांनी, खेळाडूंपासून कलाकार, सामान्य नागरीक अशा विविध घटकांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारतीय राज्यघटनेत India that is Bharat..shall be union of states. असं नमूद करण्यात आले आहे. याचाच अर्थ इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावे अधिकृत आहेत. तर, इंडियाऐवजी भारत असा उल्लेख व्हावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जुनी मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सरसंघचालकांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. 

घटनेत इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावं असतील तर दोन्हीपैकी कुठलंही नाव सरकार, राष्ट्रपती वापरू शकतात. हा केवळ इंडिया ऐवजी भारत या शब्दाला प्राथमिकता देण्याचा प्रयत्न आहे की इंडिया हे नावच हटवायचं आहे हे अजून स्पष्ट नाही. पण इंडिया हा शब्द घटनेतून वगळायचाच असेल तर त्यासाठी घटनादुरुस्ती मात्र करावी लागणार आहे. 

 



[ad_2]

Related posts