Lok Sabha Elections 2024 May Be Announced By The End Of February Says Sources

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election)  कधी लागणार? असा प्रश्न संपूर्ण देशाला पडलाय. मात्र आता त्याची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलीय. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यात मिळवलेल्या विजयामुळं भाजपचा (BJP)  आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. त्यामुळं विजयाची  घोडदौड कायम राहावी हा भाजपचा प्रयत्न असणार आहे. जानेवारीत होणारं राम मंदिराचं (Ram Mandir)  लोकार्पण आणि 1 फेब्रुवारीला सादर होणारा अंतरिम अर्थसंकल्प यानंतर थेट लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. 

  राम मंदिर लोकार्पण, अर्थसंकल्पानंतर निवडणुका?  सर्व बाबींची पूर्तता झाली तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होऊ शकते. येत्या वर्षात 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.  त्यानंतर 1 फेब्रुवारीला निवडणूक वर्षाचा अर्थसंकल्प किंवा ‘व्होट ऑन अकाउंट’ मांडला जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजप हिंदू व्होट बँकेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर संसदेत पाच ते सहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर संसदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार

 केंद्र सरकार भाजपच्या नेतृत्वाखालील पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विशेषतः मध्यमवर्गीय लोकांच्या फायद्यासाठी काही लोक समर्थक योजना जाहीर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ‘व्होट ऑन अकाउंट’ किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर संसदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील अशी अपेक्षा केली जाऊ शकते. 2019 मध्ये 10 मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाली. 11 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदान सात टप्प्यात झाले आणि ते 19 मे 2019 रोजी संपले. 23 मे रोजी मतमोजणीची तारीख होती. 

एका केंद्रीय मंत्र्याने सांगितले की संसद निवडणुकीच्या तारखा आधीच घोषीत केल्या जाऊ शकतात आणि अशा परिस्थितीत त्या एक महिना पुढे केल्या जातील. आमच्याकडे अजून साठ दिवस कमी आहेत. ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि इतरांसारख्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली की या वेळी मतदान लवकर होऊ शकते आणि ते या वर्षाच्या शेवटी होऊ शकते.

हे ही वाचा :

महायुतीचं ठरलं! पंकजा मुंडे लोकसभा लढणार? भाजपच्या मोठ्या नेत्याची एबीपी माझाला माहिती

 

[ad_2]

Related posts