Congress Bharat Jodo Nyaya Yatra Denied Permission For In Manipur Will Start From Imphal Itself Said Congress Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : काँग्रेसची (Congress) ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nayay Yatra) मणिपूरमधूनच (Manipur) सुरू होणार असून इंफाळमधूनच या यात्रेची सुरुवात होईल, असं काँग्रेस पक्षाकडून बुधवार 10 जानेवारी सांगण्यात आलं आहे. काँग्रेसला इंफाळच्या पॅलेस मैदानासाठी परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती देखील यावेळी पक्षाकडून देण्यात आलीये. मणिपूरच्या सरकारला काँग्रेसच्या या यात्रेची भीती वाटत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. कोणत्याही परिस्थितीत ही यात्रा थांबवणार नाही आणि मणिपूरमधूनच या यात्रेची सुरुवात होईल, अशी स्पष्ट भूमिका देखील काँग्रेसने मांडली आहे. 

‘पॅलेस मैदानासाठी परवानगी मागितली होती…’

पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की,आम्हाला माहिती मिळाली आहे की मणिपूर सरकारने इंफाळमधील पॅलेस मैदानावर यात्रेसाठी मागितलेली परवानगी नाकारली आहे. जर भारत जोडो न्याय यात्रा ही पूर्व ते पश्चिम असणार आहे, तर आम्ही मणिपूरला कसं दुर्लक्षित करु शकतो, अशाने आम्ही लोकांमध्ये कोणता संदेश देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

आमच्या न्याय यात्रेला मणिपूरचं सरकार घाबरतंय – काँग्रेस

आम्हाला फक्त मणिपूरपासूनच प्रवास सुरू करायचा आहे. आता आम्ही मणिपूरमधील इतर कोणत्याही ठिकाणावरुन या यात्रेची सुरुवात करणार नाही. या संदर्भात अधिक माहिती लवकरच दिली जाईल, असं केसी वेणुगोपाळ यांनी म्हटलं. आम्ही यात्रा काढणार आहोत, असं आम्ही आधीच सांगितलं होतं, तरीही राज्य सरकार आमच्या यात्रेची परवानगी कशी नाकारु शकतं, असा सवाल देखील केसी वेणुगोपाळ यांनी यावेळी उपस्थित केलाय. 

आमच्या दौऱ्याला मणिपूर सरकार घाबरले- काँग्रेस

वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, “आम्हाला फक्त मणिपूरपासूनच प्रवास सुरू करायचा आहे. आता आम्ही मणिपूरमधील इतर ठिकाणाहून प्रवास सुरू करू. या संदर्भात अधिक माहिती लवकरच दिली जाईल.” वेणुगोपाल यांचा दावा- आम्ही यात्रा काढू असे आधीच सांगितले होते. तरीही ते (राज्य सरकार) हे करण्यास का नकार देत आहेत? त्यांना आमच्या भेटीची भीती वाटते, म्हणून त्यांनी परवानगी दिली नाही.त्यांना आमच्या या यात्रेची भीती वाटत असून त्याचसाठी त्यांनी परवानगी नाकारली असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केलीये. 

पक्षाकडून काँग्रेस तयारी सुरु

त्याचवेळी पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं की, इंफाळ येथूनच काँग्रेसच्या न्याय यात्रेची सुरुवात होईल. पॅलेस ग्राऊंड सोडून अन्य काहीसाठी परवानगी मागितली जात आहे. ती मंजूर केली जाईल अशी अपेक्षा आहे. या यात्रेसाठी  एक वेबसाइटही तयार करण्यात आली असून, त्यामध्ये यात्रेशी संबंधित दैनंदिन माहिती अपडेट केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Ram Mandir : लोकार्पण सोहळ्याला काँग्रेसची पाठ? निमंत्रण असून अयोध्येत हजर न राहण्याचा पक्षाचा निर्णय : सूत्र

[ad_2]

Related posts