‘काँग्रेसमुक्त भारत’ऐवजी ‘काँग्रेसयुक्त भाजप’ झाला, काँग्रेस सोडा आणि..’; ठाकरे गटाचा टोला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Leaders Joining BJP Get Rajya Sabha Seat: राज्यसभेच्या निवडणुकीवरुन ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्यांना थेट राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाते हीच मोदींची गॅरंटी आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या नादात वेडापिसा झालेला भाजप त्याच काँग्रेसशिवाय एक इंचही पुढे जाऊ शकत नाही, हेच या साऱ्यामधून सिद्ध होत असल्याचा टोलाही ठाकरे गटाने लागवला आहे. घोडेबाजाराला ‘सरकारी कोंदण’ “राज्यसभेच्या 15 जागांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेनुसार क्रॉस व्होटिंग झालेच. हे क्रॉस व्होटिंग किंवा घोडेबाजार भाजपकडून शंभर टक्के होणार ही खात्रीही खरी…

Read More