‘आम्हाला वाटलं होतं की…’, कोहलीच्या अनुपस्थितीवर रोहित शर्माने अखेर मौन सोडलं; ‘एक्स्पोज होण्यापेक्षा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने इंग्लंडला भारताला त्यांच्यात मायभूमीत पराभवाची धूळ चाखण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान पहिल्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नाही आहे. वैयक्तिक कारणास्तव आपल्याला पहिल्या दोन सामन्यांमधून वगळण्याची विनंती त्याने बीसीसीआयकडे केली होती. त्यानुसार त्याला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या सामन्याच्या आधी कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कोणत्या खेळाडूला संधी द्यावी यासंबंधी मत मांडलं.  पाहुण्या संघाने भारतात मालिका जिंकून 12…

Read More