MP IFS Officer Burst Teak Wood Smuggling Racket; १२ लाखांचं सागवान लाकूड जप्त

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भोपाळ: पुष्पा चित्रपट आठवतो? रक्तचंदनाच्या तस्करीसाठी नानाविध प्रकार वापरले जातात. विविध माध्यमातून तस्करीचे प्रयत्न करतात. चित्रपटाचा हिरो पुष्पा तस्करीसाठी विविध मार्ग वापरुन रक्तचंदनाची तस्करी करतो. त्याच्या हुशारीपुढे अनेकदा पोलीस कमी पडतात. मध्य प्रदेशात मात्र याच्या अगदी उलट घडलं आहे.बेतूलमधील महूपानीच्या जंगलात सागवानाच्या २२ झाडांची कत्तक करण्यात आली. या झाडांची लाकडं राजस्थानच्या भिलवाड्यात पोहोचवण्यात आली. ट्रकच्या मदतीनं लाकडं राजस्थानपर्यंत पोहोचवली गेली. त्यानंतर वन विभागातील १२ जणांचं पथक भिलवाड्यात पोहोचलं. तेव्हा लाकडांची कापणी सुरू होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच काही जण पळाले. मालकानं वन विभागाच्या पथकाला आपल्या वरपर्यंत असलेल्या ओळखींबद्दल सांगत धमकीच दिली. मात्र पथकानं लाकडं जप्त केली.
नाल्यात पडला, बॉडी ५ किमी दूर सापडली; कुटुंब म्हणतं, पाय घसरला; पोलिसांना वेगळाच संशय
वन विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा नागलेंच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. लाकडं जवळपास ७०० किलोमीटर दूर पाठवण्यात आली होती. त्यांची जप्तीसाठी पूजा नागलेंच्या पथकानं ५७ तास खास ऑपरेशन राबवलं. या प्रकरणात २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. महूपानीच्या जंगलात महिन्याभरापूर्वी सागवानाची २२ झाडं कापण्यात आली. या प्रकरणाचा तपास वन विभागाकडून सुरू होता. पूजा यांच्यासोबत १२ जण यावर काम करत होते.

तपासाच्या सुरुवातीला भुरा नावाच्या चालकाचं नाव समोर आलं. भुरा खंडवामध्ये होता. त्याला पकडून बैतुलला आणण्यात आलं. हरदामधील विष्णोई गँगनं महूपानीमधील सागवान राजस्थानच्या भिलवाड्यात पाठवल्याचं भुरानं सांगितलं. दिवसा झाडांवर खुणा करण्यात येतात आणि मजूर रात्री येऊन काही तासांमध्ये ती झाडं कापतात. मग त्यांना ट्रकमध्ये टाकण्यात येतं, अशी माहिती भुरानं दिली.
ती एक चूक नडली अन् कार पाण्यावर तरंगू लागली; बहिण गमावलेल्या भावानं सांगितला थरारक घटनाक्रम
‘बेतूलपासून ७०० किलोमीटर दूर असलेल्या भिलवाड्यात सागवान पोहोचवण्यात आल्याचं भुरानं सांगितलं. रस्त्यात कित्येक नाके आणि वन विभागाचे बॅरिकेड्स असताना ट्रक इतक्या दूर कसे गेले, असा प्रश्न आम्हाला पडला. लाकडं जप्त करण्यासाठी इतक्या दूर कसं जायचा हादेखील सवाल होता. पण वरिष्ठांनी मला लाकडं जप्त करण्याची परवानगी दिली. ११ मे रोजी १३ जणांचं पथक बैतूलसाठी निघाली. १२ मे रोजी आम्ही भिलवाड्याच्या हरिपुरा गावात छापा टाकण्यात आला. तिथे अवैध लाकडं विकण्यात आली होती,’ असं पूजा यांनी सांगितलं.
टाकी फुल करायला पंपावर; कामगारानं पेट्रोल भरलं, दुसऱ्याच मिनिटाला काढलं; तरुणासोबत काय घडलं?
छापा टाकताच लाकडं कापणारे मजूर पळू लागले. लाकडं कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनचा मालक रामेश्वर सुतारला बोलावलं असता त्यानं सुरुवातीला आम्हालाच धमकी दिली. मात्र पथकानं मागे हटण्यास नकार दिला. अखेर त्यानं आत्मसमर्पण केलं. आपण गोकुळ विश्नोईकडून ७ लाख रुपयांना लाकडं खरेदी केल्याचं त्यानं सांगितलं. जप्त करण्यात आलेल्या लाकडाची किंमत १२ लाख रुपये आहे.

[ad_2]

Related posts