[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
काय आहे संपूर्ण प्रकरण…
खरंतर, या प्रकरणाला २००७ पासून सुरुवात झाली. लुधियाना चंदीगड रेल्वे लाईनच्या बांधकामावेळी एका शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली होती. पण यावेळी त्याला रेल्वेकडून योग्य तो मोबदला मिळाला नाही. त्यानंतर कटना गावातला शेतकरी संपूर्ण सिंग याने यासाठी न्यायालयात दाद मागितली आणि संपूर्ण प्रकरणाची नोंद केली. यानंतर न्यायालयाने निकाल देत शेकऱ्याला १.०५ कोटी रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. मात्र, रेल्वेने नुकसान भरपाईची रक्कमही शेतकऱ्याला दिली नाही.
नुकसान भरभाई न देता चक्क ट्रेनच केली शेतकऱ्याच्या नावावर…
न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेल्या आदेशाचं रेल्वेने पालन न केल्यामुळे या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी लुधियाना स्थानकावरील ट्रेन क्रमांक १२०३० सह स्टेशन मास्टरचं कार्यालयही जप्त करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कटाना इथला रहिवासी संपूर्ण सिंग हा रेल्वेच्या मालमत्तेचा मालक बनला. यानंतर विभाग अभियंता प्रदीप कुमार यांनी न्यायालयीन अधिकाऱ्यांकडून ट्रेन सोडवून घेतली. मात्र, हे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू असून त्यावर सुनावणी सुरू आहे.
२०१२ मध्ये अपील दाखल करण्यात आली…
मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या पहिल्या आदेशामध्ये कोर्टाने नुकसान भरपाई म्हणून २५ लाख रुपये प्रति एकर वरून ५० लाख रुपये केली होती. त्यानंतर ही भरपाई १.४७ कोटी रूपयांवर गेली. ही याचिका २०१२ मध्ये दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने २०१५ मध्ये पुन्हा रेल्वेला नुकसान भरपाईचे आदेश दिले. पण यानंतरही रेल्वेने याकडे दुर्लक्ष केलं.
[ad_2]