नवरेदव आला नाही म्हणून नवरीमुलीने भावोजीसह केलं लग्न; सामूहिक विवाहसोहळ्यात धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील झाशी येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाहसोहळ्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरदेव पोहोचला नाही म्हणून नवरीमुलीने थेट आपल्या भावोजींसहच लग्नगाठ बांधली. पण जेव्हा तिची पोलखोल झाली तेव्हा लगेच कुंकू पुसत हा सगळा प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान यासंबंधी समाज कल्याण अधिकारी ललिता यादव यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, तपास केला जाईल असं सांगितलं आहे.  झांशीच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानात हा सगळा प्रकार घडला आहे. मंगळवाीर येथे सामूहिक विवाह सोहळ्याअंतर्गंत अनेक जोडप्यांचं लग्न लावण्यात आलं. पण यावेळी एका नवरीमुलीसह लग्न करण्यासाठी तिचा नवरदेव…

Read More