[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पावसाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीची कारणे कोणती?
![पावसाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीची कारणे कोणती?](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
प्रत्येक ऋतूचा पर्यावरणावर वेगळा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ जेव्हा पावसाळा येतो तेव्हा वातावरणातील बदल, आर्द्रतेच्या पातळीत वाढ आणि हवेच्या दाबात चढ-उतार होऊ शकतात. या कालावधीत तापमानात चढ-उतार होत असतात.
परिणामी हे सर्वच पावसाळ्यात सांधेदुखीस कारणीभूत ठरतात. काही लोकांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जितका त्रास होतो तितका उन्हाळ्यात वाटत नाही. पावसाळ्यात सांध्यातील अस्वस्थतेस कारणीभूत असलेल्या इतर घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. यावरील उपाय घ्या जाणून.
शरीर उबदार ठेवा
![शरीर उबदार ठेवा](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
मान्सूनमध्ये मुसळधार पावसाने तापमानात घट दिसून येते. यामुळे एकूण हवेच्या तापमानात घट होते, ज्यामुळे सांध्यातील अस्वस्थता दूर होते. सांधेदुखी नियंत्रित करण्यासाठी उबदार राहणे महत्वाचे आहे कारण यामुळे शरीरात रक्तप्रवास सुरळीत होतो.
उबदार राहणे, दुखापत झालेल्या सांध्यावर हॉट थेरेपीची वापर करणे, हायड्रोथेरपी आणि उबदार कपड्यांचा वापर करणे या सर्व गोष्टींमध्ये मदत होऊ शकते.
(वाचा – गरोदरपणात खाज येतेय? मग दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो कोलस्टेसिस)
नियमितपणे व्यायाम करा
![नियमितपणे व्यायाम करा](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
पावसाळ्यात शारीरिक हालचाली कमी केल्याने सांध्यातील अस्वस्थतेत लक्षणीय भर पडते. नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरते. यामध्ये स्ट्रेचिंग आणि शरीर लवचिक करणारे व्यायामांचा समावेश आहे. रक्त प्रवाह सुरळीत राखणे, स्नायू, ऊतक, स्नायुबंध आणि उर्जा वाढवून अस्वस्थता कमी करण्यास मदत होते.
(वाचा – Uric Acid रक्तात मिसळण्यापूर्वीच बाहेर काढून फेकेल १० रूपयाची ही गोष्ट, किडनी पण राहील सुरक्षित)
पौष्टिक, संतुलित आहार घ्या
![पौष्टिक, संतुलित आहार घ्या](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
पौष्टिक, संतुलित आहार घेतल्याने तुम्हाला निरोगी, वेदनारहित आयुष्य जगता येते. सांध्यातील अस्वस्थता आणि जळजळ कमी करण्यात मदत करण्यासाठी योग्य आहाराचे सेवन करा.
व्हिटॅमिन ई युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. सुकामेवा, अवोकॅडो, तेलबिया, सीफूड्स, बेरीज, फळे आणि धान्यांचे नियमित सेवन करा. आहारात अंडी आणि औषधी वनस्पतींचा देखील समावेश करू शकता.
(वाचा – पोटाचे झालेत टायर्स, १५ दिवस रोज खा हे ५ पदार्थ, कंबर होईल ३४ पासून २८ इंचाची)
वजन नियंत्रित राखा
![वजन नियंत्रित राखा](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे पावसाळ्यात सांध्यांचा त्रास वाढू शकतो. म्हणून, वजन नियंत्रित राखा. पावसाळ्यात घरच्या घरी व्यायाम करा. शरीराच्या अतिरीक्त वजनामुळे तुमच्या सांध्यावर ताण येतो, त्यामुळे वेदना वाढू शकतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी योग्य आहाराबरोबर व्यायामाची जोड हवी.
एअर कंडिशनर वापरणे टाळा
![एअर कंडिशनर वापरणे टाळा](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
पावसाळ्यात घरामध्ये एअर कंडिशनर वापरल्याने सांध्यांचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे, जर तुम्हाला सांधेदुखी किंवा हाडांच्या आरोग्याच्या समस्या असतील तर एअर कंडिशनर वापर शक्यतो टाळा कारण त्यामुळे वेदना वाढू शकतात.
हवामानाचा परिणाम
![हवामानाचा परिणाम](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
हवामानाचा प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम होतो. तुमचा त्रास हवामानानुसार बदलत असल्याचे लक्षात आल्यास, वेदनांचे व्यवस्थापन करणाऱ्या पर्यायांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला.
जेव्हा तुम्हाला वर नमूद केलेली लक्षणे आढळतील तेव्हा लक्षणे ती तीव्र होण्यापासून टाळण्यासाठी आणि संधिवाताचा भार कमी करण्यासाठी तुम्ही वैद्यकीय मदत घ्या. नियमित चाचणी करायला विसरु नका.
अनेकदा रक्त तपासणीची शिफारस केली जाऊ शकते अशावेळी आवश्यक त्या तपासणी करुन घ्या. थायरॉईडच्या समस्यांमुळे सांध्यांमध्ये अस्वस्थता वाढू शकते. म्हणून थायरॉईड तपासणी करायला विसरु नका.
[ad_2]