LokSabha: ‘वफा खुद से नही होती…’, EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलला, 26 एप्रिलला दुसरा टप्पा तर शेवटचा टप्पा 1 जूनला असणार आहे. तर मतमोजणी 4 जूनला होईल. दरम्यान या पत्रकार परिषदेत आयुक्त राजीव कुमार यांनी आपला शायराना अंदाज मांडला.  राजीव कुमार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना शायरीची मदत घेतली. त्यांनी राजकीय पक्षांना एकमेकांवर वैयक्तिक हल्ला करु नका…

Read More