‘आम्ही काय आंधळे वाटलो का?,’ सुप्रीम कोर्ट रामदेव बाबांवर संतापलं; म्हणालं ‘तुम्ही फार हलक्यात घेताय’

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातींप्रकरणी योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची बिनशर्त माफी फेटाळली आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसुद्दीन अमनुल्लाह यांनी यादरम्यान दोघांना अत्यंत कडक शब्दांत सुनावलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं जाणुनबुझून, इच्छेने आणि वारंवार उल्लंघन करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.  पंतजलीचे संस्थापक बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांनी मागितलेल्या सर्व माफी फेटाळताना आपण आंधळे नाही आहोत अशा शब्दांत सुनावलं आहे. तसंच आम्ही या प्रकरणी उदार होऊ इच्छित नाही असंही सांगितलं. पतंजली विरोधात इतके दिवस कारवाई न केल्याबद्दल कोर्टाने उत्तराखंड परवाना प्राधिकरणावर ताशेरे ओढले.…

Read More