[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पावसात का होतो कानाचा संसर्ग?
![पावसात का होतो कानाचा संसर्ग? पावसात का होतो कानाचा संसर्ग?](https://static.langimg.com/thumb/101588059/maharashtra-times-101588059.jpg?width=680&resizemode=3)
पावसाचे दूषित पाणी कानात शिरून बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. या दिवसांत आर्द्रतेची पातळी वाढल्याने सहाजिकच बुरशीजन्य संसर्गास आमंत्रण मिळतें जीवाणूंच्या वाढीसाठी हा पोषक काळ असून या दिवसात पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कानात वेदना का होतात?
![कानात वेदना का होतात? कानात वेदना का होतात?](https://static.langimg.com/thumb/101588058/maharashtra-times-101588058.jpg?width=680&resizemode=3)
सामान्यतः ओटोमायकोसिस म्हणून ओळखल्या जाणार्या कानाच्या बुरशीजन्य संसर्गामुळे कानात वेदना जाणवू लागतात. संक्रमणाची इतर कारणे म्हणजे सर्दी किंवा फ्लू आणि अलर्जी. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हेमोफिलिक इन्फ्लूएन्झा सारखे जीवाणुंमुळे एखाद्या व्यक्तीला कानाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
(वाचा – रक्तासारखी लालभडक असणारी ५ फळं करतात किडनीतील घाण फ्लश आऊट, Toxins काढतात बाहेर)
धोक्याची लक्षणे कोणती ?
![धोक्याची लक्षणे कोणती ? धोक्याची लक्षणे कोणती ?](https://static.langimg.com/thumb/101588057/maharashtra-times-101588057.jpg?width=680&resizemode=3)
ज्यांना कानाचा संसर्ग आहे त्यांना कान बंद होणे, खाज सूटणे, सूज येणे, कान दुखणे, ऐकू कमी येणे, कानावाटे पाण्यासारखा स्त्राव बाहेर पडणे, चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी आणि ताप यासारखी लक्षणे दिसू शकतात. लक्षणे दिसल्यानंतर वेळीच निदान व उपचार करणे गरजेचे आहे.
(वाचा – कमीत कमी कोणत्या वयात मुलं होऊ शकतात बाप, वडील होण्याचे योग्य वय कोणते काय सांगतं विज्ञान)
पावसाळ्यात अशी घ्या कानांची काळजी
![पावसाळ्यात अशी घ्या कानांची काळजी पावसाळ्यात अशी घ्या कानांची काळजी](https://static.langimg.com/thumb/101588056/maharashtra-times-101588056.jpg?width=680&resizemode=3)
- उपचारास विलंब करू नका कारण असे केल्याने संसर्ग आणखी वाढू शकतो
- कानात टाकायचे ड्रॅाप्स आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा वापर करा
- कानाची नियमित तपासणी करुन घ्या. अंघोळीनंतर कान स्वच्छ आणि कोरडे करा
- इअरवॅक्स काढण्यासाठी इअरबड्स वापरणे टाळा कारण यामुळे दुखापत होऊ शकते आणि तात्पुरती श्रवणशक्ती कमी होऊ शकते
- पावसाळ्यात थंड आणि आंबट पदार्थ खाऊ नका कारण त्यामुळे कान दुखणे आणखी वाढू शकते. जर तुम्हाला घशाचा संसर्ग असेल तर चहा, कॉफी किंवा इतर गरम पेयांचे सेवन करा
- घशाचा संसर्ग टाळण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, स्वच्छ कपड्याने कान स्वच्छ करा. जेव्हा सर्दी होते तेव्हा जोराने नाक शिंकरणे हे टाळा. त्यामुळे देखील कानाचा संसर्ग वाढू शकतो
(वाचा – शंकराला वाहिले जाणारे बेलपत्र आहे आरोग्यासाठी फायदेशीर, डायबिटीसपासून बद्धकोष्ठतेवर गुणकारी)
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा
[ad_2]