Wifes Right to Half of Husbands Property Important Judgment of Madras High Court;पतीच्या अर्ध्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार, हायकोर्टचा महत्वपूर्ण निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Property Rights in India:  गृहिणीला तिच्या पतीच्या संपत्तीच्या अर्ध्या भागावर हक्क आहे. मद्रास उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एक गृहिणी 24 तास सुट्टीशिवाय काम करते. घराची काळजी घेणारी महिला कुटुंबातील सदस्यांना प्राथमिक वैद्यकीय मदत देऊन घरगुती डॉक्टर म्हणूनही काम करते असे यावेळी न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांच्या एकल खंडपीठाने सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, महिलेला तिच्या पतीच्या कमाईतून विकत घेतलेल्या मालमत्तेत समान वाटा मिळेल. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी पत्नीच्या सहकार्याशिवाय पती पैसे कमवू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मालमत्ता पती किंवा पत्नीच्या नावावर खरेदी केली गेली असेल, तरीही ती पती-पत्नी दोघांच्या प्रयत्नातून वाचवलेल्या पैशातून खरेदी केली गेली आहे असे मानले पाहिजे, असेही न्यायमुर्तींनी म्हटले.

उच्च न्यायालयाने काय म्हटले?

पती आणि मुलांच्या संगोपनासाठी स्वतःला झोकून दिल्यानंतर, स्त्री ही प्रत्येक वस्तूवर समान भागीदार असते.

गृहिणींच्या योगदानाची दखल घेण्यासाठी अद्याप कोणताही कायदा तयार करण्यात आलेला नसला तरी, न्यायालये या योगदानाची ओळख पटवून देऊ शकतात.  महिलांना त्यांच्या कुटुंबाप्रती दिलेल्या समर्पणाचे प्रतिफळ मिळाल्यास त्यांना योग्य न्याय मिळेल असे न्यायालयाने म्हटले आहे.

2016 मध्ये कन्नियनचे दुसरे अपील निकाली काढताना न्यायालयाने ही टिप्पणी केली होती. ज्याच्याशी त्याने 1965 मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी होती. त्या व्यक्तीने 1983 ते 1994 दरम्यान सौदी अरेबियात काम केले होते.

भारतात पोहोचल्यानंतर त्याने तक्रार नोंदवली की, माझी पत्नी माझ्या कमाईतून विकत घेतलेल्या मालमत्तेवर अतिक्रमण करतेय. तसेच तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप देखील त्याने केला होता. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांनी त्यांची आई कंसला अम्मल यांच्याविरोधातील खटला लढवला. वृद्ध महिलेने पतीच्या संपत्तीत हिस्सा मागितला होता.

2015 मध्ये स्थानिक न्यायालयाने पाचपैकी तीन मालमत्ता आणि मालमत्तांमध्ये समान वाटा असल्याचा अम्मलचा दावा नाकारला.  विवादित मालमत्ता तिच्या पतीने स्वतःच्या बचतीतून विकत घेतली असली तरी, अम्मलला 50 टक्के वाटा मिळण्यास पात्र आहे,असे मद्रास उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाच्या न्यायाधीशांनी  सांगितले. 

Related posts