[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Diabetes अर्थात मधुमेह हा असाध्य म्हणजेच ज्यावर कायमस्वरूपी असा कोणताही उपाय नसलेला रोग आहे, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. तुम्हाला जास्त तहान लागणे, रात्री वारंवार लघवी होणे, हात-पाय सुन्न होणे, अनावश्यक वजन कमी होणे, त्वचेला संसर्ग होणे असा त्रास होत असेल तर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असल्याची दाट शक्यता आहे. भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 100 दशलक्ष अर्थात 10 करोड भारतीयांना मधुमेह आहे.
याशिवाय 15 करोड लोक प्री-डायबिटीजशी झुंज देत आहेत. याचा अर्थ लवकरच 25 करोड लोक मधुमेहाचे बळी होणार आहेत. मेदांता, द मेडिसिटीच्या व्हॅस्कुलर सर्जरीचे चेअरमन डॉ. राजीव पारख यांनी एका अभ्यासाचा हवाला देत ही माहिती दिली. जी सर्वांचे डोळे खाडकन उघडणारी हे आणि येणाऱ्या काळात आपण स्वत:चे आरोग्य अधिकाधिक जपून निरोगी राहिले पाहिजे ही संकेत देणारी आहे. (फोटो सौजन्य :- iStock)
[ad_2]