[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लिंबू
![लिंबू](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, पाण्यात लिंबू मिसळल्याने त्याची शक्ती दुप्पट होते. यामुळे व्हिटॅमिन सी वाढते. तसेच, लिंबू पाणी हे पचन सुधारण्यास, शरीराला डिटॉक्स करण्यास किंवा वजन कमी करण्यास मदत करते.
(वाचा :- पुरूषहो, डोक्यापासून पायापर्यंत सर्व बंद नसा खोलतात ही 5 फळे, हार्ट फेल ते लैंगिक समस्या कोणताच आजार होत नाही)
पुदिना
![पुदिना](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
पाण्यात पुदिना मिक्स केल्याने पुदिना मिश्रित पाणी हे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि ते रोखण्यास मदत करते. याशिवाय पुदिना हे शरीराचे तापमान नियंत्रित करते, इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते, रक्तदाब नियंत्रित करते आणि तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते.
(वाचा :- 10 Foods For Diabetes : हे 10 पदार्थ डायबिटीजसाठी अमृत, किलो किलोने खाल्ले तरी इंचभरही वाढणार नाही Blood Sugar)
काकडी
![काकडी](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
काकडी तुम्हाला हायड्रेटेड ठेवते, वजन कमी करण्यास मदत करते, अँटिऑक्सिडंट्स प्रदान करते, कर्करोग रोखण्यात मदत करते, रक्तदाब नियंत्रित करते, त्वचेचे आरोग्य सुधारते आणि हाडांचे आरोग्य सुधारते.
(वाचा :- नाश्त्यात हे 10 पदार्थ खाता? डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक व किडनी लिव्हर होतं बाद, एक चूक सर्व अवयव निकामी)
जिरे
![जिरे](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
जिऱ्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यात कमी कॅलरीज असतात. हे एक अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत म्हणून ओळखले जाते. या पाण्यामुळे पचन सुधारते, चयापचय सुधारते, जळजळ कमी होते, कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच जीरायुक्त पाणी मधुमेह नियंत्रित करते आणि शरीराला हायड्रेट करते.
(वाचा :- Teeth Whitening Remedy : दातांवरचा पिवळा घाणेरडा थर होईल झटक्यात साफ, हि-यांसारखी चमकेल बत्तीशी, करा हे 4 उपाय)
बडीशेप
![बडीशेप](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
बडीशेप मिक्स केलेले पाणी उत्कृष्ट डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. हे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि पचन सुधारते. बडीशेप मधील दाहक-विरोधी गुणधर्म बद्धकोष्ठता, सूज येणे आणि अपचनाने ग्रस्त असलेल्या लोकांना मदत करतात. या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या साध्या पाण्यात चिया बसीड्स, सफरचंद सायडर व्हिनेगर, दालचिनी, आले मिस्क केले तरी तुम्हाला फायदा मिळेल. या सर्व गोष्टी पाण्यातील पोषकतत्त्वे वाढवून तुम्हाला अनेक गंभीर आरोग्य समस्यांपासून वाचवू शकतात.
(वाचा :- Calcium च्या कमीने हलेल शरीरातील पूर्ण हाडांचा सांगाडा,दही-दूध सोडा, खा हे 10 पदार्थ, लोखंडाहून टणक होतील हाडे)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]