[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
स्वच्छतेकडे द्या लक्ष
![स्वच्छतेकडे द्या लक्ष स्वच्छतेकडे द्या लक्ष](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
पालकांनी चांगल्या स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेतून किंवा खेळाच्या मैदानातून घरी आल्यानंतर मुलांना नियमितपणे हात धुण्यास आणि आंघोळ करण्यास प्रवृत्त करा. लहान मुलांना स्वतःची स्वच्छता पटकन कळत नाही. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे पालकांनी काटेकोरपणे लक्ष द्यावे.
बाहेरचे पदार्थ खाणे टाळा
![बाहेरचे पदार्थ खाणे टाळा बाहेरचे पदार्थ खाणे टाळा](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
मुलांनी उकळलेले पाणी पिणे, बाहेरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळणे, घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेळ करणे आवश्यक आहे, परंतु ते वापरण्यापुर्वी स्वच्छ पाण्याने धुतल्याची खात्री करा.
कच्च्या अन्नाचे सेवन टाळा, उच्च प्रथिनयुक्त आहार, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चा समावेश असलेल्या पदार्थांची निवड करा. जसे की आवळा, संत्री, शिमला मिरची, शेवग्याच्या शेंगा, सुकामेवा आणि तेलबिया यांचा आहारात समावेश करा.
(वाचा – हाडाचा सापळा झाला असेल तर खा दुधासह हे शाकाहारी पदार्थ, १ महिन्यात व्हाल गुबगुबीत)
निरोगी अन्नाचे सेवन
![निरोगी अन्नाचे सेवन निरोगी अन्नाचे सेवन](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
चरबीयुक्त पदार्थ, तेलकट पदार्थ खाल्ल्याने अपचन होऊ शकते. पालकांनी ही खात्री केली पाहिजे की त्यांचे मूल निरोगी अन्नाचे सेवन करत आहे. दह्यामध्ये प्रीबायोटिक भरपूर प्रमाणात असते आणि ते नियमितपणे खाण्याचा प्रयत्न करावा. मुलांना घरातील जेवणच द्यावे. पावसाळ्यात उघड्यावरील आणि तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नयेत.
(वाचा – ६ पदार्थ जे रक्तात मिसळवतात युरिक अॅसिड, दोन्ही किडनी होतील निकामी ठरेल जीवघेणे)
साचलेल्या पाण्यापासून दूर राहा
![साचलेल्या पाण्यापासून दूर राहा साचलेल्या पाण्यापासून दूर राहा](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण असल्याने, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जार, फुलदाण्या, वॉटर कुलर, घराबाहेर किंवा डस्टबिनमध्ये साचलेले पाणी काढून टाका आणि आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडी राखण्याचा प्रयत्न करा.
(वाचा – तुम्हीही सकाळी उठून पिताय का खूप पाणी? योग्य की अयोग्य काय आहे आयुर्वेदाचा सल्ला)
घाणेरड्या पाण्यात मुलांना खेळू देऊ नका
![घाणेरड्या पाण्यात मुलांना खेळू देऊ नका घाणेरड्या पाण्यात मुलांना खेळू देऊ नका](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
मुलाने पावसाच्या घाणेरड्या पाण्यात खेळू नये याची काळजी घ्या कारण असे केल्याने त्वचेची अॅलर्जी आणि संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आपल्या लहान मुलांना घाणेरड्या पावसात खेळायला सोडू नये आणि जरी मुलं खेळली तरीही घरी आल्यानंतर त्यांना स्वच्छ आंघोळ घालावी आणि नखातील मातीही व्यवस्थित काढून टाकावी.
[ad_2]