[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जया किशोरीने 15 दिवसांत वजन कसं कमी केलं?
![जया किशोरीने 15 दिवसांत वजन कसं कमी केलं? जया किशोरीने 15 दिवसांत वजन कसं कमी केलं?](https://static.langimg.com/thumb/101386915/maharashtra-times-101386915.jpg?width=680&resizemode=3)
मुलाखतीदरम्यान जया किशोरी यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्या सांगितले आहे. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या की ‘सुरुवातीला मी वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट केले. मात्र, लवकरच मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप करावा लागला. मी जवळजवळ सर्व काही खाणे बंद केले.
यामुळे माझे वजन कमी होत होते, पण दुसरीकडे माझी तब्येतही अनेक प्रकारे बिघडत होती. माझ्या मेंदूने काम करणे बंद केले होते. मी कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करू शकत नव्हते, जेव्हा मी गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा मला लक्ष केंद्रित करता येत नव्हते. या गोष्टींचा अतिरेक झाला, तेव्हा मला समजले की ही पद्धत योग्य नाही. शरीरासाठी आवश्यक गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नसतील, तर मन कसे चालेल? यानंतर मी नवीन पद्धत स्वीकारली.
बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद
![बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद](https://static.langimg.com/thumb/101386913/maharashtra-times-101386913.jpg?width=680&resizemode=3)
मी माझ्या आहाराची अधिक काळजी घेईन असा विचार केला होता. मी बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद केले होते. त्यांना 98-99 टक्के सात्विक अन्न खायला आवडते. त्यांना तांदूळ आणि बेसन जास्त आवडते. मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांनी साखरेवरही नियंत्रण ठेवले होते. तिने जेवणात साखर घेतली नाही. त्यांनी गव्हाच्या पोळीपेक्षा बाजरीची रोटी जास्त खाण्यास सुरुवात केली, जी वजन कमी करण्यात खूप प्रभावी ठरली. जया किशोरींप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या आहारात बदल करू वजन कमी करू शकता.
व्यायाम देखील महत्त्वाचा
![व्यायाम देखील महत्त्वाचा व्यायाम देखील महत्त्वाचा](https://static.langimg.com/thumb/101386912/maharashtra-times-101386912.jpg?width=680&resizemode=3)
या सर्व गोष्टींव्यतिरिक्त नियमित व्यायाम हा देखील वजन कमी करण्याच्या या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या खाण्याच्या सवयी प्रमाणात राहिल्या की व्यायाम देखील खूपच महत्त्वाचा भाग आहे.
योगा करा
![योगा करा योगा करा](https://static.langimg.com/thumb/101386907/maharashtra-times-101386907.jpg?width=680&resizemode=3)
जया किशोरीच्या म्हणण्यानुसार, वजन कमी केल्यानंतरही ती रोज योगा किंवा व्यायाम करते. दुसरीकडे, जर काही कारणास्तव त्यात काही अंतर असेल तर दुसऱ्या दिवशी ती एक्स्ट्रा वर्कआउट करते. योगा केल्याने मन शांत राहण्यास देखील मदत होते. त्यामुळे तुम्ही देखील योगा करा.
टीप: लेखात लिहिलेले सल्ला आणि सूचना ही फक्त सामान्य माहिती आहे. कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा प्रश्नासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(वाचा :- उपाशी पोटी हा पदार्थ खाल्याने Bad Cholesterol रक्तातून खेचून बाहेर निघेल, आजच करा हा उपाय)
पाण्याचे प्रमाण
![पाण्याचे प्रमाण पाण्याचे प्रमाण](https://static.langimg.com/thumb/101386905/maharashtra-times-101386905.jpg?width=680&resizemode=3)
शरीर निरोगी ठेवण्यासाठी ती वेळोवेळी पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे तुम्ही जास्त जास्त पाण्याचे सेवन करा यामुळे तुमच्या शरीरातील नको असणारे घटक बाहेर पडण्यास मदत होईल.
(वाचा :- कॉमेडियन मनीष पॉलने केलं सर्वांना चकित, अडीच महिन्यांत केले जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, पोटावरील चरबी मेणासारखी वितळली)
[ad_2]